धक्कादायक! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात २९ वर्षीय महिलेवर बलात्कार

मुंबई : मुंबईतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन आरोपींनी महिलेला स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅण्ड मागे नेत आळीपाळीने बलात्कार केला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.


२२ सप्टेंबरच्या रात्री पीडित महिला छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरात उभी होती. त्यावेळी दोन व्यक्ती तिथे आले. काही कळण्याच्या आत एका आरोपीने महिलेचे तोंड दाबले. आरडा-ओरड करून नये म्हणून दोन्ही आरोपींनी तिला धमकावत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या टॅक्सी स्टॅण्डच्या पाठीमागे घेऊन गेले.


दोन्ही आरोपींनी तिथे महिलेला धमकावले आणि आळीपाळीने अत्याचार करुन पसार झाले. या घटनेनंतर महिलेने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा