धक्कादायक! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात २९ वर्षीय महिलेवर बलात्कार

  163

मुंबई : मुंबईतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन आरोपींनी महिलेला स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅण्ड मागे नेत आळीपाळीने बलात्कार केला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.


२२ सप्टेंबरच्या रात्री पीडित महिला छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरात उभी होती. त्यावेळी दोन व्यक्ती तिथे आले. काही कळण्याच्या आत एका आरोपीने महिलेचे तोंड दाबले. आरडा-ओरड करून नये म्हणून दोन्ही आरोपींनी तिला धमकावत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या टॅक्सी स्टॅण्डच्या पाठीमागे घेऊन गेले.


दोन्ही आरोपींनी तिथे महिलेला धमकावले आणि आळीपाळीने अत्याचार करुन पसार झाले. या घटनेनंतर महिलेने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.