आजपासून वर्ल्डकप २०२४ला सुरूवात, पहिल्याच दिवशी रंगणार दोन सामने

मुंबई: आजपासून टी-२० वर्ल्डकप २०२४ला सुरूवात होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सामन्यांची मजा घेता येणार आहे. दुबई आणि शारजामध्ये खेळवल्या जाणाऱ्या महिला टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये आज पहिल्या दिवशी दोन सामने असतील. स्पर्धेचा पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंडच्या महिला संघादरम्यान असेल तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका महिला संघादरम्यान रंगेल.


बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता शारजा येथे सुरू होईल तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना शारजामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला रविवारी पाहायला मिळेल. न्यूझीलंडविरुद्ध हा सामना रंगत आहे.


आजपासून सुरू होत असलेल्या महिला टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना २० ऑक्टोबरला रविवारी खेळवला जाईल. १८ दिवसांमध्ये एकूण २३ सामने रंगतील. आधी ही स्पर्धा बांगलादेशात होणार होती. मात्र तेथील परिस्थिती पाहता आयसीसीने ही स्पर्धा यूएईमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.


स्पर्धेत १० संघ भाग घेत आहेत. त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप एमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका आहे.तर ग्रुप बीमध्ये बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ आहेत.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना