आजपासून वर्ल्डकप २०२४ला सुरूवात, पहिल्याच दिवशी रंगणार दोन सामने

  56

मुंबई: आजपासून टी-२० वर्ल्डकप २०२४ला सुरूवात होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सामन्यांची मजा घेता येणार आहे. दुबई आणि शारजामध्ये खेळवल्या जाणाऱ्या महिला टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये आज पहिल्या दिवशी दोन सामने असतील. स्पर्धेचा पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंडच्या महिला संघादरम्यान असेल तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका महिला संघादरम्यान रंगेल.


बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता शारजा येथे सुरू होईल तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना शारजामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला रविवारी पाहायला मिळेल. न्यूझीलंडविरुद्ध हा सामना रंगत आहे.


आजपासून सुरू होत असलेल्या महिला टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना २० ऑक्टोबरला रविवारी खेळवला जाईल. १८ दिवसांमध्ये एकूण २३ सामने रंगतील. आधी ही स्पर्धा बांगलादेशात होणार होती. मात्र तेथील परिस्थिती पाहता आयसीसीने ही स्पर्धा यूएईमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.


स्पर्धेत १० संघ भाग घेत आहेत. त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप एमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका आहे.तर ग्रुप बीमध्ये बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ आहेत.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र