आजपासून वर्ल्डकप २०२४ला सुरूवात, पहिल्याच दिवशी रंगणार दोन सामने

मुंबई: आजपासून टी-२० वर्ल्डकप २०२४ला सुरूवात होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सामन्यांची मजा घेता येणार आहे. दुबई आणि शारजामध्ये खेळवल्या जाणाऱ्या महिला टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये आज पहिल्या दिवशी दोन सामने असतील. स्पर्धेचा पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंडच्या महिला संघादरम्यान असेल तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका महिला संघादरम्यान रंगेल.


बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता शारजा येथे सुरू होईल तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना शारजामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला रविवारी पाहायला मिळेल. न्यूझीलंडविरुद्ध हा सामना रंगत आहे.


आजपासून सुरू होत असलेल्या महिला टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना २० ऑक्टोबरला रविवारी खेळवला जाईल. १८ दिवसांमध्ये एकूण २३ सामने रंगतील. आधी ही स्पर्धा बांगलादेशात होणार होती. मात्र तेथील परिस्थिती पाहता आयसीसीने ही स्पर्धा यूएईमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.


स्पर्धेत १० संघ भाग घेत आहेत. त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप एमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका आहे.तर ग्रुप बीमध्ये बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ आहेत.

Comments
Add Comment

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या