Tuesday, April 22, 2025

निर्णायक

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

मी नेहमी सांगतो समाजात तीन प्रकारचे लोक असतात. कष्टकरी वर्ग, मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग म्हणजे श्रीमंत वर्ग. श्रीमंतांना कशाशीच पर्वा नसते. त्यांना वाटते आपल्याकडे पैसे आहेत, पैशाच्या बळावर आपण काहीही करू शकतो म्हणून ते अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. वाटेल ते कर्म करतात व मोकळे होतात. ते म्हणतात पैशाच्या बळावर आपण वाटेल ते निभावून नेऊ. दुसरे मध्यम वर्ग! ते फार चिकित्सक असतात. त्यांना जर सांगितले ना जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानाचा जरा अभ्यास करा, प्रवचने ऐका तर ते ऐकायलाच तयार नसतात. सगळेच श्रीमंत असे करतात किंवा सगळेच मध्यमवर्गीय असे करतात हे मला म्हणायचे नाही. पण बरेच मध्यमवर्गीय लोक हे ऐकत नाहीत. ऐकले तर या कानाने ऐकतात व एका कानाने सोडून देतात. तिसरा वर्ग म्हणजे कष्टकरी वर्ग, कामगार वर्ग ज्याला आपण कनिष्ट मध्यमवर्ग म्हणतो. हे जे आहेत ना ते खूप श्रद्धाळू असतात. सद्गुरू सांगतात मग ते खरे असलेच पाहिजे असे ते मानतात. ते जास्त विचारही करत नाहीत. ते सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करतात आणि त्यांना अनुभव पण लगेच येतो.

सद्गुरूंवर त्यांची श्रद्धा असते. सद्गुरू जे सांगतात ते लगेच अमलात आणतात. हिरीरीने, जिद्दीने अमलात आणतात. जीवनविद्या मिशनमध्ये ९५ टक्के पेक्षा जास्त लोक गरीब आहेत ते सुखी झाले. कारण का? ज्यांनी ज्यांनी जीवनविद्येचे तत्त्वज्ञान १०० टक्के आचरणांत नाही आणले तरी चालेल, १० टक्के तरी आचरणात आणा. हे १० टक्के म्हणजे काय? शुभ चिंतन तरी करा. काही लोक म्हणतात तुम्ही म्हणता ते खरे कशावरून? मला अमेरिकेला एका बाईने विचारले, तुम्ही प्रार्थनेचे महत्त्व सांगता ते खरे कशावरून? तुम्ही अनुभव घ्या. साखर गोड आहे कशावरून? तोंडात टाक म्हणजे कळेल. चिंच आंबट आहे, मीठ खारट आहे कशावरून? चव घ्या म्हणजे कळेल. कशावरून, कशावरून म्हणत राहिलात तर आम्ही काय सांगणार. सांगायचा मुद्दा, आपण जे काही करतो, action करतो ती action व निसर्गाचे नियम यांचा एकमेकांशी संबंध येतो. कर्म केले रे केले की निसर्गाचे नियम सक्रिय होतात. यांत action and reaction हा निसर्ग नियमांचा राजा आहे. प्राण्यांचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा गरुड, माशांचा राजा देवमासा, फळांचा राजा आंबा तसे action तशी reaction हा निसर्ग नियमांचा राजा आहे. बाकीचे सर्व नियम हे या पहिल्या नियमाशी संबंधित आहेत.

As you think so you become यांत as you think ही action तर so you become ही reaction. Law of cause and effect. Action असते तशी reaction असतेच. हे निसर्ग नियम पुष्कळ आहेत. हे निसर्ग नियम मानवी जीवनांत निर्णायक आहेत. ते कुणाच्याही बाबतीत अपवाद करत नाहीत. माणसे अपवाद करतात, काही special case करतात. हे मी का सांगतो आहे. आपणच नियम करायचे व ते धुडकावून लावायचे असे माणूस करतो, निसर्ग नियम असे करत नाहीत. त्यांच्यासाठी श्रीमंत व गरीब दोन्ही सारखेच. निसर्ग नियमांमध्ये राजा व प्रजा दोन्ही सारखेच. याचा अनुभव घ्यायचा असेल, तर ही विश्वप्रार्थना मी सांगतो त्याप्रमाणे म्हणा. हिचा अनुभव अनेकांना आलेला आहे, येतो आहे. त्यासाठी श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. आपल्या जीवनांत यश, समृद्धी, समाधान पाहिजे तर सद्गुरू पाहिजे, सद्गुरूंचे मार्गदर्शन पाहिजे. आता सद्गुरू करायचा की न करायचा हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या
जीवनाचा शिल्पकार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -