Navratri: नवरात्रीत उपवास करताय तर जरूर लक्षात ठेवा या टिप्स

मुंबई: हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे नवरात्री. आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे. यानंतर ९ दिवसा दुर्गा मातेच्या विविध रूपांची पुजा केली जाते. यावेळी नवरात्रीत अनेकजण उपवास करतात. नवरात्रीत उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते मात्र या दरम्यान काही खबरदारीही घेतल पाहिजे. थोडीशी जरी बेफिक्री केली तर आरोग्य बिघडवू शकते.


योग्य पद्धतीने उपवास केला की बॉडी डिटॉक्स होते आणि पोटही रिलॅक्स होते. फास्टिंगमुळे वजनही नियंत्रणात येते. दरम्यान, अधिक काळ उपाशी राहिल्यानेही आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. यामुळे अॅसिडिटी, अशक्तपणा, डोकेदुखी या समस्या होऊ शकतात.



त्यामुळे तुम्हीही जर नवरात्रीत उपवास करत असाल तर खालील टिप्सचा जरूर वापर करा.


नवरात्रीत उपवास करत असाल तर शरीर भरपूर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात २-३ लीटर पाणी प्या. स्वत:ला हायड्रेट ठेवल्याने शरीरात इलेक्ट्रोलाईट बॅलन्स राहते आणि त्रास होत नाही.


उपवास करताना भरपूर फळे खा. तसेच ड्रायफ्रुट्सचे सेवन करा. असे केल्याने शरीरात पोषकतत्वांची कमतरता भासत नाही. तसेच अशक्तपणाही जाणवणार नाही


नवरात्रीत प्रोटीन फूड्स जसे पनीर, दही आणि बदाम सारखे पदार्थ खात राहा. दरम्यान, प्रोटीन पचण्यास वेळ लागतो. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.


उपवासादरम्यान तळलेले पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी भाजलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. तळलेले पदार्थ शरीरास नुकसान पोहोचवतात.


नवरात्रीत उपवास करता एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की अधिक काळ पोट रिकामे राहता कामा नये. दर २-३ तासांनी काही ना काही खात राहा. असे केले नाही तर तुम्हाला अॅसिडिटी, डोकेदुखीसारख्या समस्या होऊ शकतात.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या