Navratri: नवरात्रीत उपवास करताय तर जरूर लक्षात ठेवा या टिप्स

  77

मुंबई: हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे नवरात्री. आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे. यानंतर ९ दिवसा दुर्गा मातेच्या विविध रूपांची पुजा केली जाते. यावेळी नवरात्रीत अनेकजण उपवास करतात. नवरात्रीत उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते मात्र या दरम्यान काही खबरदारीही घेतल पाहिजे. थोडीशी जरी बेफिक्री केली तर आरोग्य बिघडवू शकते.


योग्य पद्धतीने उपवास केला की बॉडी डिटॉक्स होते आणि पोटही रिलॅक्स होते. फास्टिंगमुळे वजनही नियंत्रणात येते. दरम्यान, अधिक काळ उपाशी राहिल्यानेही आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. यामुळे अॅसिडिटी, अशक्तपणा, डोकेदुखी या समस्या होऊ शकतात.



त्यामुळे तुम्हीही जर नवरात्रीत उपवास करत असाल तर खालील टिप्सचा जरूर वापर करा.


नवरात्रीत उपवास करत असाल तर शरीर भरपूर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात २-३ लीटर पाणी प्या. स्वत:ला हायड्रेट ठेवल्याने शरीरात इलेक्ट्रोलाईट बॅलन्स राहते आणि त्रास होत नाही.


उपवास करताना भरपूर फळे खा. तसेच ड्रायफ्रुट्सचे सेवन करा. असे केल्याने शरीरात पोषकतत्वांची कमतरता भासत नाही. तसेच अशक्तपणाही जाणवणार नाही


नवरात्रीत प्रोटीन फूड्स जसे पनीर, दही आणि बदाम सारखे पदार्थ खात राहा. दरम्यान, प्रोटीन पचण्यास वेळ लागतो. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.


उपवासादरम्यान तळलेले पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी भाजलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. तळलेले पदार्थ शरीरास नुकसान पोहोचवतात.


नवरात्रीत उपवास करता एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की अधिक काळ पोट रिकामे राहता कामा नये. दर २-३ तासांनी काही ना काही खात राहा. असे केले नाही तर तुम्हाला अॅसिडिटी, डोकेदुखीसारख्या समस्या होऊ शकतात.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर