Navratri 2024: शारदीय नवरात्रीला आजपासून सुरूवात, जाणून घ्या घटस्थापनेचा मुहूर्त

  104

मुंबई: आज ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस देवी मातेची पुजा-आराधना केली जाते. तसेच उपवासही केले जातात. अनेकजण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण पहिला आणि शेवटच्या दिवशी उपवास करून नवरात्रीची सांगता करतात.



घटस्थापनेचा मुहूर्त


शारदीय नवरात्रीला घटस्थापनेच्या नंतर नवरात्रीची सुरूवात होते. यावर्षी घटस्थापनेचे दोन शुभ मुहूर्त आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत पहिला मुहूर्त आहे.त्यानंतर दुपारी १२.०३ वाजल्यापासून ते दुपारी १२.५१ वाजेपर्यंत दुसरा मुहूर्त आहे.


घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करा. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. जिथे तुम्ही घटाची स्थापना करणार आहात तेथे साफसफाई करून गंगाजल शिंपडा. त्यानंतर विधीवत घटाची स्थापना करा.



नवरात्रीचा पहिला दिवस


शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री मातेला समर्पित आहे. देवी सतीच्या रूपात आत्मदहन केल्यानंतर देवी पार्वतीने पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेतला. संस्कृतमध्ये शैलचा अर्थ पर्वत म्हणून देवीला पर्वताची पुत्री म्हणून शैलपुत्री असे ओळखले जाते.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस