Mumbai Local : पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक जारी; 'या' तारखेपासून सुरु होणार १२ नव्या फेऱ्या!

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) उपनगरीय लोकल सेवेचं नवं वेळापत्रक १२ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या अंतर्गत १२ नव्या फेऱ्यांची सुरुवात होणार आहे. सध्या सुरु असलेल्या ६ फेऱ्यांसह १० लोकल गाड्यांचे डबे १२ ऐवजी १५ करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या १३९४ वरून १४०६ वर जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.



नव्या फेऱ्यांचा समावेश



  • विरार ते चर्चगेट : एक फास्ट लोकल

  • डहाणू रोड ते विरार : दोन स्लो लोकल

  • अंधेरी, गोरेगाव, बोरिवली ते चर्चगेट : एक स्लो लोकल

  • चर्चगेट ते नालासोपारा : एक फास्ट लोकल

  • चर्चगेट ते गोरेगाव : दोन स्लो लोकल

  • चर्चगेट ते अंधेरी : एक स्लो लोकल

  • विरार ते डहाणू रोड : दोन स्लो लोकल


सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात


पश्चिम रेल्वेने मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आणलं आहे. या मार्गिकेच्या उभारणीसाठी राम मंदिर ते मालाड स्थानकादरम्यान लोकल गाड्यांचा वेग तात्पुरता ३० किमी प्रतितास करण्यात आला आहे. या कामामुळे दररोज १५० लोकल फेऱ्या ४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलचा वेग पूर्ववत होईल.



भविष्यातील सुधारणा


पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम देखील हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवेच्या कार्यक्षमतेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा