गुरूवार, शुक्रवारी गोरेगाव स्थानकावर रात्रकालिन ब्लॉक

मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामाच्या संदर्भात, गोरेगाव येथे गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री १२:३० ते ४: ३० दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर ४ तास, म्हणजेच ३ आणि ४ ऑक्टोबरला २:०० ते ३: ३० दरम्यान सर्व मार्गांवर १:३० तासांचा मोठा ब्लॉक घेतला जाईल.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक दरम्यान, सर्व जलद मार्गावरील लोकल बोरीवली ते अंधेरी दरम्यान १२: ३० ते ४ : ३० या वेळेत धिम्या मार्गावर धावतील. बोरिवली आणि अंधेरी दरम्यान १२: ३० ते ४ : ३० पर्यंत धीम्या मार्गावर मेल/एक्स्प्रेस गाड्या बोरीवली आणि अंधेरी दरम्यान धावतील.


याव्यतिरिक्त, काही मेल/एक्स्प्रेस गाड्या १० ते २० मिनिटे उशीराने धावतील. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्या प्रभावित होतील आणि ब्लॉक कालावधीत त्या रद्द / शॉर्ट टर्मिनेटेड होतील. रद्द केलेल्या गाड्यांची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल