'इराणने मोठी चूक केली,त्यांना किंमत मोजावी लागेल' मिसाईल हल्ल्यानंतर नेतन्याहू यांचे खुले आव्हान

नवी दिल्ली: इराणकडून मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्याबाबत इस्त्रायलने कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, इराणने खूप मोठी चूक केली आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल. सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीच्या सुरूवातीला नेतन्याहू म्हणाले की जे कोणी त्यांच्यावर हल्ला करतील त्यांना ते प्रत्युत्तर देतील.


सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, इराणने आज रात्री खूप मोठी चूक केली आणि याची त्यांना किंमत मोजावी लागेल. मी जाफामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो तसेच जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. मिसाईल हल्ल्याप्रमाणेच या दहशतवादी हल्ल्यामागे एक प्राणघातक मार्गदर्शक हात होता.



जपान, अमेरिकाने दिली ही प्रतिक्रिया


इराणने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी जपान आणि अमेरिकेने निंदा व्यक्त केली आहे. जपानचे नवे पंतप्रधान शिगेरू इशिबा म्हणाले इराणकडून इस्त्रायलवर करण्यात आलेले मिसाईल हल्ले अस्वीकारार्ह आहेत. आम्ही याची निंदा करतो. मात्र त्यासोबतच स्थिती शांत करण्यासाठी आणि याला पूर्ण युद्धात रूपांतरित होण्यापासून रोखण्यासाठी मदत करू इच्छितो. अमेरिकाने मोठ्या युद्धाच्या शंकेमुळे तेहरानच्या हल्ल्याविरुद्ध प्रत्युत्तर कारवाई करण्याचे वचन दिले आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल