PM Narendra Modi : पंतप्रधानांकडून महात्मा गांधी व शास्त्रींना अभिवादन

नवी दिल्ली : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदरांजली अर्पण केलीय. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर फोटोसह श्रद्धांजली संदेश जारी केला आहे.


गांधींच्या १५५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यासंदर्भातील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, सर्व देशवासियांच्या वतीने आम्ही आदरणीय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. यासोबतच मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली.


विजय घाट या शास्त्रींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून शास्त्रींना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, 'माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.

Comments
Add Comment

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला