PM Narendra Modi : पंतप्रधानांकडून महात्मा गांधी व शास्त्रींना अभिवादन

नवी दिल्ली : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदरांजली अर्पण केलीय. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर फोटोसह श्रद्धांजली संदेश जारी केला आहे.


गांधींच्या १५५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यासंदर्भातील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, सर्व देशवासियांच्या वतीने आम्ही आदरणीय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. यासोबतच मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली.


विजय घाट या शास्त्रींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून शास्त्रींना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, 'माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी