बदलापूर एन्काऊंटरची माजी न्यायाधीश करणार चौकशी

एन्काउंटर खरा की खोटा याविषयीचा अहवाल तीन महिन्यात करणार सादर


मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला ३ महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार आहे.


दरम्यान, लैंगिक छळाच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी सीआयडीने चौकशी सुरू केली आहे. ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर शाळकरी मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर ठाणे एसआयटीने चौकशी सुरू केली होती. विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर आणि चकमकीदरम्यान घडलेल्या घटनांच्या पोलिसांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलीस चकमकीत ठार करण्याच्या घटनेचे ठाणे पोलिसांच्या निर्णयाचे समर्थन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने नुकतेच या चकमकीच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती भोसले हे मे २०२४ मध्ये घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीच्या समितीचेही नेतृत्व करत आहेत. हा एक सदस्यीय आयोग २३ सप्टेंबरची चकमक खरी होती की खोटी यासाठी याच्याशी संबंधीत प्रत्येकाचा तपास करणार आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक

भांडुप रेल्वेवरील पुलाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आयआयटीकडून आराखड्याची पडताळणी मुंबई : भांडुप रेल्वेवरील भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा पूल वीर