LPG Cylinder: सणासुदीआधी गॅस सिलेंडर महागला, इतक्या रुपयांची वाढ

मुंबई: ऑक्टोबर महिना हा सणासुदींचा महिना असतो. या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची रेलचेल आहे. दरम्यान, या सणासुदीच्या महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गॅस किंमतीमध्ये ही वाढ १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली असून ४८.५० रूपये प्रति सिलेंडर झाली आहे. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आज १ ऑक्टोबर २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत.


देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर आता १७४० रूपये झाले आहेत. यात ४८.५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हे भाव १६९१.५० रूपये इतके होते.


कोलकातामध्ये १९ किग्रॅमच्या सिलेंडरचे दर आता १८५०.५० रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात हे दर १८०२.५० रूपये इतके होते.


मुंबईत एलपीजी सिलेंडरचे दर आता १६९२ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १६४४ रूपये होते.


चेन्नईत १९ किग्रॅच्या सिलेंडरचे दर आता १९०३ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १८५५ रूपये होते.


दरम्यान, सामान्य गृहिणी वापरत असलेल्या १४.२ किग्रॅ वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००