LPG Cylinder: सणासुदीआधी गॅस सिलेंडर महागला, इतक्या रुपयांची वाढ

मुंबई: ऑक्टोबर महिना हा सणासुदींचा महिना असतो. या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांची रेलचेल आहे. दरम्यान, या सणासुदीच्या महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गॅस किंमतीमध्ये ही वाढ १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली असून ४८.५० रूपये प्रति सिलेंडर झाली आहे. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आज १ ऑक्टोबर २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत.


देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर आता १७४० रूपये झाले आहेत. यात ४८.५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हे भाव १६९१.५० रूपये इतके होते.


कोलकातामध्ये १९ किग्रॅमच्या सिलेंडरचे दर आता १८५०.५० रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात हे दर १८०२.५० रूपये इतके होते.


मुंबईत एलपीजी सिलेंडरचे दर आता १६९२ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १६४४ रूपये होते.


चेन्नईत १९ किग्रॅच्या सिलेंडरचे दर आता १९०३ रूपये झाले आहेत. यात ४८ रूपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात हे दर १८५५ रूपये होते.


दरम्यान, सामान्य गृहिणी वापरत असलेल्या १४.२ किग्रॅ वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू