Sai Baba : काशी येथील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून पूजा करणे वर्ज्य


वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे सनातन रक्षक दल संघटनेने तब्बल १० मंदिरांमधून साईबाबांच्या (Sai Baba) मूर्ती हटवल्या आहेत. या मूर्ती सन्मानपूर्वक हटवल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


यासंदर्भातील माहितीनुसार, काशीच्या बडा गणेश मंदिर, पुरुषोत्तम मंदिर इत्यादी १० प्रमुख मंदिरामधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत.


सनातन रक्षक दलाने याबाबत सांगितले की, आतापर्यंत आम्ही अज्ञानामधून साईबाबांची पूजा करत होतो. आता आम्ही मूर्ती हटवत आहोत. पूर्ण सन्मानासह मंदिर व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. वाराणसीमध्ये मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची सुरुवात बडा गणेश मंदिर येथून करण्यात आली. सनातन रक्षक दलाच्या सदस्यांनी या मंदिरातील साईबाबांची मूर्ती कापडामध्ये गुंडाळून तिथून बाजूला केली. त्यानंतर इतर मंदिरातील मूर्ती हटवण्याची तयारी सुरू झाली.


साईबाबांच्या मूर्ती हटवण्यामागचे कारण सांगताना सनातन रक्षक दलाने सांगितले की, आम्ही साई बाबांचे विरोधक नाही आहोत. मात्र शास्त्रानुसार कुठल्याही मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करणे वर्ज्य आहे.


हिंदू धर्मानुसार मंदिरांमध्ये केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती यांच्या स्वरूपात मूर्ती स्थापन केल्या जाऊ शकतात. यापूर्वी देखील शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साई पूजेला विरोध केला होता. तर बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनीही साई बाबांच्या पूजेला विरोध केला होता. ते म्हणाले होते की, मी साईबाबांचा विरोधक नाही. साईबाबांची महात्मा म्हणून पूजा होऊ शकते. मात्र परमात्मा म्हणून त्यांची पूजा होऊ शकत नाही.

Comments
Add Comment

पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि

देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत

Pm Narendra Modi : पंतप्रधान मोदी गुरुवारी वाराणसीत मॉरिशसच्या पंतप्रधानांना भेटणार

नवी दिल्ली : मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या,

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे