मुंबई : नवरात्रोत्सव (Navratri Festival 2024) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये तरुण-तरुणींचा गरबा (Garba) खेळण्यासाठीचा एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी तसेच काहीजण देवीच्या दर्शनासाठी सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडतात. अशावेळी कमी प्रमाणात गाड्यांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांना घरी परतण्यास त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेआ मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना नवरात्रीत उशिरापर्यंत घरी जाणे अगदी सोपे होणार आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येणार आहेत. तर दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे नवरात्रोत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…