Mumbai Metro : नवरात्रोत्सवात रात्री घरी जाणे होणार सोपे! मुंबई मेट्रोने दिली खुशखबर

मुंबई : नवरात्रोत्सव (Navratri Festival 2024) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये तरुण-तरुणींचा गरबा (Garba) खेळण्यासाठीचा एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी तसेच काहीजण देवीच्या दर्शनासाठी सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडतात. अशावेळी कमी प्रमाणात गाड्यांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांना घरी परतण्यास त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेआ मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना नवरात्रीत उशिरापर्यंत घरी जाणे अगदी सोपे होणार आहे.


महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.


या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येणार आहेत. तर दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे नवरात्रोत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.

Comments
Add Comment

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि