Mumbai Metro : नवरात्रोत्सवात रात्री घरी जाणे होणार सोपे! मुंबई मेट्रोने दिली खुशखबर

मुंबई : नवरात्रोत्सव (Navratri Festival 2024) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये तरुण-तरुणींचा गरबा (Garba) खेळण्यासाठीचा एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी तसेच काहीजण देवीच्या दर्शनासाठी सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडतात. अशावेळी कमी प्रमाणात गाड्यांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांना घरी परतण्यास त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेआ मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना नवरात्रीत उशिरापर्यंत घरी जाणे अगदी सोपे होणार आहे.


महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.


या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येणार आहेत. तर दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे नवरात्रोत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली