Mumbai Metro : नवरात्रोत्सवात रात्री घरी जाणे होणार सोपे! मुंबई मेट्रोने दिली खुशखबर

मुंबई : नवरात्रोत्सव (Navratri Festival 2024) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये तरुण-तरुणींचा गरबा (Garba) खेळण्यासाठीचा एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी तसेच काहीजण देवीच्या दर्शनासाठी सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडतात. अशावेळी कमी प्रमाणात गाड्यांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांना घरी परतण्यास त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेआ मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना नवरात्रीत उशिरापर्यंत घरी जाणे अगदी सोपे होणार आहे.


महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.


या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येणार आहेत. तर दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे नवरात्रोत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.

Comments
Add Comment

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड