Nepal Flood : नेपाळमध्ये पावसाचं थैमान! पूरस्थितीमुळे १००हून अधिक जणांचा मृत्यू

काठमांडू : महाराष्ट्रासह इतर राज्यातही परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच नेपाळमध्ये पडणाऱ्या परतीच्या पावसाने कहर (Nepal Flood) केला आहे. नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेपाळमध्ये संततधार कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत तब्बल ११२ लोकांचा मृत्यू झाला. इतर लोकांना वाचवण्यासाठी ३००० सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची सुटका केली आहे.


दरम्यान, मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये ४४ ठिकाणी महामार्ग रोखण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत. तसेच या काळात हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे