Nepal Flood : नेपाळमध्ये पावसाचं थैमान! पूरस्थितीमुळे १००हून अधिक जणांचा मृत्यू

काठमांडू : महाराष्ट्रासह इतर राज्यातही परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच नेपाळमध्ये पडणाऱ्या परतीच्या पावसाने कहर (Nepal Flood) केला आहे. नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेपाळमध्ये संततधार कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत तब्बल ११२ लोकांचा मृत्यू झाला. इतर लोकांना वाचवण्यासाठी ३००० सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची सुटका केली आहे.


दरम्यान, मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये ४४ ठिकाणी महामार्ग रोखण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत. तसेच या काळात हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.