CM Eknath Shinde : “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”

मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल


मुंबई : आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर टीका केली.


बदलापूर प्रकरणातील (Badlapur Case) आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “बदलापूर प्रकरण घडल्यानंतर आरोपीला फाशी द्या, असे विरोधक म्हणत होते. त्यानंतर आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी बंदूक फक्त प्रदर्शनासाठी ठेवायची का? पोलिसांनी समजा ते केलं नसते तर विरोधकच म्हणाले असते की चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला. मग पोलिसांची बंदूक काय प्रदर्शनासाठी ठेवली का? म्हणजे विरोधक इकडून पण बोलतात आणि तिकडूनही बोलतात”, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला.



पोलीस बंदोबस्तात अखेर अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला. मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जमीन देण्यास प्रत्येक ठिकाणी स्थानिकांकडून विरोध होताना दिसला. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जागा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश राज्य सरकारने दिले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशाला एक दिवस बाकी असताना आता अक्षय शिंदेवर उल्हासनगरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त

मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर; महापालिका राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी