Raj Thackeray : लाडक्या बहिणींना रोजगार द्या : राज ठाकरे

  77

नागपूर : ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, अशा मुद्द्यांवर महाराष्ट्र मवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना भाष्य केले.


विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. तर आज नागपूर, भंडारी, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात खूप चर्चा आहे. या योजनेत सध्या महिलांच्या तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यात लाडकी बहीणवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. असे असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. सत्ताधारी स्वत:च्या स्वार्थासाठी अशा योजना तयार करतायत, अशी टीका राज ठाकरेंनी महायुती सरकारवर केली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला