Ujjain: उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर भिंत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

मुंबई: उज्जैनच्या(ujjain) महाकालेश्वर मंदिराच्या गेट नंबर ४ समोर मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाहून अधिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची स्थिती नाजूक सांगितली जात आहे. त्यांना उज्जैन आणि इंदौरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


उज्जैन कलेक्टर आणि महाकालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष नीरज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दोघांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्ह्ला प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत.


उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गेटनंबर ४ समोर जुनी भिंत होती. ही भिंत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रंगरंगोटी करण्यात आली होती. या भिंतीच्या वरच्या भागात मध्य प्रदेश पर्यटन विकास निगमने एक लक्झरी हॉटेल बनवले आहे. या हॉटेलच्या गार्डनचे संपूर्ण पाणी या भिंतीच्या रस्त्याच्या खाली उतरत होते. शुक्रवारी उज्जैनमध्ये संध्याकाळी ४ वाजल्यापासून सातत्याने जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे संपूर्ण पाण्याने भिंतीवर दबाव बनला होता. यामुळे भिंत अतिशय नाजूक झाली होती.


ही भिंत त्या लोकांवर कोसळली जे महाकालेश्वर मंदिरात येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रसाद, फूल इत्यादींची विक्री करण्याचे काम करत होते. या दुर्घटनेत एक महिला आणि एका पुरुषाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर जखमींवर उपचार केले जात आहेत.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील