Ujjain: उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर भिंत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

मुंबई: उज्जैनच्या(ujjain) महाकालेश्वर मंदिराच्या गेट नंबर ४ समोर मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाहून अधिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची स्थिती नाजूक सांगितली जात आहे. त्यांना उज्जैन आणि इंदौरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


उज्जैन कलेक्टर आणि महाकालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष नीरज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दोघांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्ह्ला प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत.


उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गेटनंबर ४ समोर जुनी भिंत होती. ही भिंत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रंगरंगोटी करण्यात आली होती. या भिंतीच्या वरच्या भागात मध्य प्रदेश पर्यटन विकास निगमने एक लक्झरी हॉटेल बनवले आहे. या हॉटेलच्या गार्डनचे संपूर्ण पाणी या भिंतीच्या रस्त्याच्या खाली उतरत होते. शुक्रवारी उज्जैनमध्ये संध्याकाळी ४ वाजल्यापासून सातत्याने जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे संपूर्ण पाण्याने भिंतीवर दबाव बनला होता. यामुळे भिंत अतिशय नाजूक झाली होती.


ही भिंत त्या लोकांवर कोसळली जे महाकालेश्वर मंदिरात येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रसाद, फूल इत्यादींची विक्री करण्याचे काम करत होते. या दुर्घटनेत एक महिला आणि एका पुरुषाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर जखमींवर उपचार केले जात आहेत.

Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या