Ashish Shelar On Saamana Editorial : भितीच्या आणि पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या ! आशिष शेलारांचा संजय राऊतांवर घणाघात

Share

मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी व महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्टय़ा खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. अशातच भाजपकडून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. तुम्ही लोकांनी हिंदुत्व, विचार आणि आचार सोडलात टिपू सुलतानाची जयंती करणे सुरु केलीत, औरंगजेबचा फँन क्लब उघडलात, अफजलखानाची कबर तुम्हाला प्रिय वाटू लागली, याकूब मेमनची कबर तुम्ही सजवलीत.. म्हणून तुम्हाला भिती वाटतेय, त्यामुळे भितीच्या पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या बंद करा ! मर्दांसारखे लढायला समोर या, असे आवाहन भाजपने शिवसेना ठाकरे गटाला दिलंय.

नुकतंच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लांबलचक पोस्ट लिहत सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखावर जोरदार टीका केली आहे. यावेळी अप्रत्यक्षरित्या निशाणा आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर साधलाय. आम्ही सकाळी उठून नमस्ते सदा वत्सले मातृभूमे… म्हणतो तुमच्या सारखे दुसऱ्यांना शिव्याशाप देत नाही. आम्ही या मातीला मातेसमान मानतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला नम्रता शिकवू नका? असेही आशिष शेलार यांनी म्हटलंय.

आशिष शेलार काय म्हणाले?

भितीच्या आणि पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या !

एक काळ कणखर, मर्द आणि ज्वलंत विचारांनी ओतप्रोत भरलेला सामनाचा अग्रलेख असायचा. आज काल त्या जागेवर घाबरटांचे पानचट कथन पहायला मिळते आहे. जळजळ, मळमळ, थयथयाट यातून होणाऱ्या उलट्या आणि भय, भिती आणि घबराट यामुळे गाव गोळा करण्यासाठी केलेला नाच म्हणजे हा अग्रलेख असतो. भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी महाराष्ट्र दौरा सुरु करताच हे घाबरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिताभाई शाह यांना हे असेच घाबरतात. ते महाराष्ट्रात येऊ लागले की यांच्या “लुंग्या” ओल्या होतात. का? मर्दांचा पक्ष आहे म्हणून सांगताना ? या ना मर्दांसारखे समोर…!

महाराष्ट्राला काय देणार? याचा पत्ता नाही, अजेंडा नाही आणि विचार नाही. फक्त सत्तेसाठी कडबोळी केलेल्या पक्षात एकच चर्चा आणि स्पर्धा आहे ती म्हणजे “मुख्यमंत्री कोण होणार?” आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही, सत्तेसाठी नाही. आमची लढाई विचारांसाठी आहे. हिंदूत्वासाठी आहे. होय आम्हाला महाराष्ट्र द्रोह्यांना हरवायचे आहे, होय तुमच्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या काफिल्यात गुदमरलेल्या हजारो “एकनाथ शिंदे” यांना तुमच्यापासून वेगळे होण्याचे बळ द्यायचे आहे. आम्हाला महाराष्ट्र देशासोबत जोडायचा आहे. विकासाच्या वाटेवर वेगवान करायचा आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत. आमचे नेतृत्व त्यासाठी अहोरात्र झटत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या आमच्या शिरस्त नेतृत्वाची तुम्हाला भिती का वाटते? कारण महायुतीचा विजय म्हणजे हिंदुत्वाचा विजय, महायुतीचा विजय म्हणजे तुमचे पोटभरू दुकान बंद… तुमचे कट कमिशन बंद म्हणून तुमचा थयथयाट चाललाय.

सकाळी उठून आम्ही नमस्ते सदा वत्सले मातृभूमे …. म्हणतो तुमच्या सारखे दुसऱ्यांना शिव्याशाप देत नाही. आम्ही या मातीला मातेसमान मानतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला नम्रता शिकवू नका? तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? महिलेचा अपमान करुन शिक्षा झालेल्या आणि जामिनावर असलेल्या आरोपीच्या लेखणीतून आम्हाला कसले तत्वज्ञान शिकवताय? अग्रलेखातून तत्वज्ञान शिकवणाऱ्याकडे नैतिकता असावी लागते. रोज उठून खोटे बोलणाऱ्या, बदनामी करणाऱ्या बोरु बहाद्दरांचे वर्णन एका प्रसिद्ध व्यंगचित्रकाराने ” लग्नाच्या मांडवात नाचणारी करवली!” असा केले आहे.( खरं समाजातील प्रतिष्ठित, लेखिका आणि प्राध्यापिका असलेल्या महिलेची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला “करवली” ही उपमा ही देऊ नये. ) अशा माणसाच्या लेखणीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही धडे देणार? उपदेश करणार? हे म्हणजे अती झाले आणि हसू झाले यापेक्षाही भयंकर हास्यास्पद आहे.

अरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह निवडणूकीचा प्रचार करणार…हिंदुत्वासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढणार… तुम्ही हिंदुत्व, विचार आणि आचार सोडलात टिपू सुलतानाची जयंती करणे सुरु केलीत, औरंगजेब फँन क्लब उघडलात, अफजलखानाच्या कबर तुम्हाला प्रिय वाटू लागली… याकूब मेमनची कबर तुम्ही सजवलीत.. म्हणून तुम्हाला भिती वाटतेय…. ही भिती तुम्हालाच आतल्या आत सतावतेय. त्यामुळे भितीच्या पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या बंद करा ! मर्दांसारखे लढायला समोर या !!, असे आशिष शेलार यांनी ट्विटच्या पोस्टमध्ये म्हंटलंय.

Recent Posts

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

42 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

54 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

2 hours ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

2 hours ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

2 hours ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

2 hours ago