बिहारमध्ये जितिया सणादरम्यान ४३ जणांचा बुडून मृत्यू

  82

पाटणा: बिहारमध्ये जिवितपुत्रिका उत्सव साजरा केला जात असताना विविध जिल्ह्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनेत एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या सणादरम्यान स्नान करत असताना या ४३ जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य सरकारने गुरूवारी ही माहिती दिली.


बुधवारी हा उत्सव होता. या उत्सवादरम्यान १५ विविध जिल्ह्यांमध्ये या दुर्घटना घडल्या. जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान महिला आपल्या मुलांच्या दीर्घायु तसेच निरोगी आरोग्यासाठी निर्जला उपवास करतात. तसेच पवित्र स्नान करतात. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो.



चार-चार लाख रूपयांचा मदतनिधी


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या विधानात म्हटले की अनुग्रह राशी देण्याची प्रक्रिया सुरू झाला आहे. आठ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ही रक्कम आधीच मिळाली आहे.



या जिल्ह्लयांमध्ये घडल्या घटना


रिपोर्टनुसार पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कॅमूर, सीवान, रोहतास, सारण, पाटणा, वैशाली, मुझ्झफरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवल जिल्ह्यांमध्ये या सणादरम्यान या दुर्घटना घडल्या.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )