बिहारमध्ये जितिया सणादरम्यान ४३ जणांचा बुडून मृत्यू

पाटणा: बिहारमध्ये जिवितपुत्रिका उत्सव साजरा केला जात असताना विविध जिल्ह्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनेत एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या सणादरम्यान स्नान करत असताना या ४३ जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य सरकारने गुरूवारी ही माहिती दिली.


बुधवारी हा उत्सव होता. या उत्सवादरम्यान १५ विविध जिल्ह्यांमध्ये या दुर्घटना घडल्या. जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान महिला आपल्या मुलांच्या दीर्घायु तसेच निरोगी आरोग्यासाठी निर्जला उपवास करतात. तसेच पवित्र स्नान करतात. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो.



चार-चार लाख रूपयांचा मदतनिधी


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या विधानात म्हटले की अनुग्रह राशी देण्याची प्रक्रिया सुरू झाला आहे. आठ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ही रक्कम आधीच मिळाली आहे.



या जिल्ह्लयांमध्ये घडल्या घटना


रिपोर्टनुसार पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कॅमूर, सीवान, रोहतास, सारण, पाटणा, वैशाली, मुझ्झफरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवल जिल्ह्यांमध्ये या सणादरम्यान या दुर्घटना घडल्या.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१