बिहारमध्ये जितिया सणादरम्यान ४३ जणांचा बुडून मृत्यू

पाटणा: बिहारमध्ये जिवितपुत्रिका उत्सव साजरा केला जात असताना विविध जिल्ह्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनेत एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या सणादरम्यान स्नान करत असताना या ४३ जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य सरकारने गुरूवारी ही माहिती दिली.


बुधवारी हा उत्सव होता. या उत्सवादरम्यान १५ विविध जिल्ह्यांमध्ये या दुर्घटना घडल्या. जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान महिला आपल्या मुलांच्या दीर्घायु तसेच निरोगी आरोग्यासाठी निर्जला उपवास करतात. तसेच पवित्र स्नान करतात. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो.



चार-चार लाख रूपयांचा मदतनिधी


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या विधानात म्हटले की अनुग्रह राशी देण्याची प्रक्रिया सुरू झाला आहे. आठ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ही रक्कम आधीच मिळाली आहे.



या जिल्ह्लयांमध्ये घडल्या घटना


रिपोर्टनुसार पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कॅमूर, सीवान, रोहतास, सारण, पाटणा, वैशाली, मुझ्झफरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवल जिल्ह्यांमध्ये या सणादरम्यान या दुर्घटना घडल्या.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे