वरुणराजाची अवकृपा,अनेक जिल्ह्यात खरीप पिके धोक्यात

दीपक मोहिते


मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.मुंबई,ठाणे,पालघर, रायगड,सोलापूर,नाशिक व इतर अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे राज्यातील खरीप हंगामातील पीके धोक्यात आली आहेत.दरम्यान हवामान विभागाने सलग तीन दिवस अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


मुंबई व ठाणे सारख्या महानगरात सर्वत्र पाणी साचून राहिल्यामुळे कालपासून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.अनेक भागात रेल्वेरुळावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे उपनगरीय सेवा देखील विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाने शैक्षणिक संस्था ( शाळा व महाविद्यालये ) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली होती,ती तंतोतंत खरी ठरली आहे. पालघर जिल्ह्यात वाडा,विक्रमगड,जव्हार, मोखाडा,तलासरी व डहाणू तालुक्यात भातशेतीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणावर आहे.


सध्या कापणीची कामे सुरू असतानाच हे संकट कोसळल्यामुळे शेतकरी पार हडबडून गेले आहेत. अनेक भागात भरलेल्या दाण्याची रोपे खाचरात आडवी झाली आहेत. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खुशीत असलेला शेतकरी,या अशा परतीच्या पावसामुळे आता भितीच्या सावटाखाली आला आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा

मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल

Labour Minister Adv. Akash Fundkar : 'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश     मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

Minister Adv. Ashish Shelar : मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई: मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा

Devendra Fadnavis : नवी मुंबईत उभी राहणार १० हजार कोटींची 'इंटरनॅशनल मेडिसिटी'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य सरकार आणि अमेरिकेच्या 'क्लीव्हलँड क्लिनिक'मध्ये सामंजस्य करार मुंबई :

Mumbai birth records : मुंबईतील 19,734 जन्म दाखल्यांमधील दुरुस्त्या रद्द; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे सरकारचे आदेश

MUMBAI : महाराष्ट्र सरकारने 2024 ते 2026 या कालावधीत मुंबईत जन्म प्रमाणपत्रांमध्ये करण्यात आलेल्या 19,734 दुरुस्त्या रद्द

Ritu Tawde : धमक्यांना घाबरत नाही, बॉम्बस्फोट धमकीच्या ईमेल वर महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आज मंगळवारी १० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वीस (९:२०) च्या सुमारास मला धमकी देणारा एक ईमेल आला. या