Assembly Elections : राज्य विधानसभा निवडणूक; येत्या आठवड्याभरात बिगुल वाजणार!

दीपक मोहिते


मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2024) तयारीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. निवडणूक आयोगाचे (Election Commission) राजीवकुमार (RajeevKumar) हे आजपासून आपल्या पथकासह महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्ष व संबधित विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार आहेत.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा २६ ते २८ सप्टें.दरम्यान महाराष्ट्र दौरा आखण्यात आला आहे.या दौऱ्यात निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील.


२६ सप्टें.रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होत आहेत.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ सप्टें.रोजी सकाळी १०.०० वाजता निवडणूक मुख्य आयुक्त राजीवकुमार राज्यातील राजकीय पक्षांसोबत बैठक घेणार आहेत.त्यानंतर दुपारी १.०० वाजता सीईओ,नोडल अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे.त्याच दिवशी दु.३.०० वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी,आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा,सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.


संध्याकाळी ५.०० वाजता राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिका-यासमवेत बैठका होणार आहेत.या बैठकीत राज्यातील राजकीय व कायदा व सुव्यवस्थेविषयी आयुक्त आढावा घेतील. विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक पोषक वातावरण आहे का ? याबाबत आयोग उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. त्यानंतर २८ सप्टें.रोजी सकाळी साडे नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे.हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर दु. ४.०० वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील.ही पत्रकार परिषद आटोपल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होतील.या सर्व घडामोडीनंतर राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सुटावा,यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत.


निवडणूक आयोगाच्या दौऱ्यानंतर येत्या चार ते पाच दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगोलग आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.दरम्यान राजकीय आघाडीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या असून शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे.तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय नेत्याची राज्यात वर्दळ वाढली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य