Navratri : नवरात्री आणि गरब्याचा नातं काय ? हे तुम्हाला माहिती आहे का ?

नवरात्रीचा (Navratra) उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ०३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्री उत्सवात देवीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे. या दरम्यान मंडपामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. तसेच, व्रतवैकल्ये केली जातात. तसेच, या सगळ्यात जो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो गरबाही नवरात्रीत खेळला जातो. खरंतर, अनेक तरूणाईला गरब्याची आवड असते. मनसोक्त गरबा खेळतात. मात्र, त्यांना फक्त नवरात्रीतच गरबा का खेळला जातो? किंवा नवरात्री आणि गरबा यांचा काय संबंध आहे? याबाबत फारशी कल्पना नसते. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात नवरात्री आणि गरब्याचं विशेष नातं.



गरबा म्हणजे एक मातीचे भांडे 


देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. पारंपारिक रूपात गरबा म्हणजे एक मातीचे भांडे. ज्याच्या आत एक दिवा लावण्यात येतो. ज्याला गुजराती भाषेत गरबो असे म्हटले जाते. आपण नीट बारकाईने पाहिले तर गरबा हा मातीच्या भांड्याच्या सभोवती केला जातो. ज्याला गर्भ दिप असं म्हटले जाते.पूर्वी हे भारतातील गुजरात आणि राजस्थान सारख्या पारंपारिक ठिकाणी खेळले जात होते. परंतु हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आहे. गरबा या शब्दाकडे लक्ष दिले तर हा शब्द गर्भ आणि दीप यांनी बनलेला आहे. या दिव्यालाच गर्भदिप म्हणतात.

Comments
Add Comment

सॅमसंग इंडियाचा 'गॅलेक्‍सी ए०७ ५जी' लाँच

मुंबई : सॅमसंग या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्‍सी ए०७ ५जी लाँच केला. या

Barking Deer: तुम्ही पाहिलंत का कधी 'भुंकणारं हरीण'?; जाणून घ्या भुकणाऱ्या हरणाबद्दल

जर तुम्ही जंगलात किंवा डोंगराळ भागात असाल आणि अचानक तुम्हाला कुत्र्यासारखा भुंकण्याचा आवाज ऐकू आला तर

मेटाची अँटी स्कॅम मोहीम

मुंबई : 'मेटा अँटी-स्कॅम' (Meta Anti-Scam) हा मेटा कंपनीचा (Facebook, WhatsApp, Instagram) ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून

बारामतीमध्ये ग्लोबल शुगर एआय समिटचे आयोजन

बारामती : फाइंडेबिलिटी सायन्सेसने जाहीर केले आहे की ग्लोबल शुगर एआय समिट 2026 हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती,

Cancer Fighting Food In Ayurveda: आयुर्वेदातील कोणते पदार्थ कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतात, जाणून घ्या

मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते.

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित