Navratri : नवरात्री आणि गरब्याचा नातं काय ? हे तुम्हाला माहिती आहे का ?

  113

नवरात्रीचा (Navratra) उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ०३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्री उत्सवात देवीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे. या दरम्यान मंडपामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. तसेच, व्रतवैकल्ये केली जातात. तसेच, या सगळ्यात जो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो गरबाही नवरात्रीत खेळला जातो. खरंतर, अनेक तरूणाईला गरब्याची आवड असते. मनसोक्त गरबा खेळतात. मात्र, त्यांना फक्त नवरात्रीतच गरबा का खेळला जातो? किंवा नवरात्री आणि गरबा यांचा काय संबंध आहे? याबाबत फारशी कल्पना नसते. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात नवरात्री आणि गरब्याचं विशेष नातं.



गरबा म्हणजे एक मातीचे भांडे 


देवीच्या दरबारात गरबा खेळण्याला एक धार्मिक महत्त्व आहे. पारंपारिक रूपात गरबा म्हणजे एक मातीचे भांडे. ज्याच्या आत एक दिवा लावण्यात येतो. ज्याला गुजराती भाषेत गरबो असे म्हटले जाते. आपण नीट बारकाईने पाहिले तर गरबा हा मातीच्या भांड्याच्या सभोवती केला जातो. ज्याला गर्भ दिप असं म्हटले जाते.पूर्वी हे भारतातील गुजरात आणि राजस्थान सारख्या पारंपारिक ठिकाणी खेळले जात होते. परंतु हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आहे. गरबा या शब्दाकडे लक्ष दिले तर हा शब्द गर्भ आणि दीप यांनी बनलेला आहे. या दिव्यालाच गर्भदिप म्हणतात.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा