Devendra Fadnavis On Maratha Reservation : “दुर्दैवाने ते टिकू शकले नाही, मात्र…”; मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीसांच सुस्पष्ट विधान

Share

नवी मुंबई : मराठा समाज हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी मुंबईत बोलताना एक मोठं वक्तव्य केलय. “मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं, असं आमच्या सरकारचं वचन आहे. मराठा समाजाच्या या मागण्या योग्य आहेत. यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९१ वी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हजेरी लावली. यावेळी इथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक मोठे वक्तव्य केले.

“त्यानंतर ते दुर्दैवाने टिकू शकले नाही”

“ अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी आपण इथे जमतो. अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्तानेच मराठा समाजाची चळवळ उभी झाली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देशात मराठा आरक्षण हे एकमेव आरक्षण होते, जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालयातही ते टिकलं. पण दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकले नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मराठा समाजाची पिळवणूक आणि फरफट होता कामा नये”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा १० टक्के आरक्षण दिलं. मोदींनीही EWS चे आरक्षण दिलं. मराठा समाजाला त्याचाही फायदा झाला. मात्र आता सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी होत असल्याने शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही १० टक्के आरक्षण दिले. वेगवेगळ्या मागण्या आज होत आहेत, त्या चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जी कोणतीही मागणी मागतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायाचा आणि कायद्याच्या चौकटी बसला नाही म्हणून न्यायालयाने तो निर्णय रद्द करायचा, अशाप्रकारची वारंवार पिळवणूक आणि फरफट मराठा समाजाची होता कामा नये. त्यामुळेच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा करत आहोत”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हंटल.

“मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळायला हवं”

“मराठा समाजाने विविध समाजाचे नेतृत्व केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे १८ पगड जातीचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, महाराष्ट्रासाठी अशाप्रकारचे चित्र उभं राहणं हे योग्य नाही. ते उभं होऊ नये, असा सर्वांचाच प्रयत्न आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं हे आमच्या सरकारचे वचन आहे. पोलीस भरतीमधेही मराठा आरक्षण दिले. मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळायला हवं, तसेच त्यावेळी समाजामध्ये कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. आमचा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

2 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

3 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

3 hours ago