NCP : शिवसेना आणि भाजपाने दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही ठोकला तीन मतदारसंघावर दावा!

  160

पुणे : राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपाने दावा केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही (NCP) पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघावर दावा ठोकला आहे. पक्षाच्या झालेल्या मासिक बैठकीमध्ये याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.


राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची मासिक बैठक खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.


पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे. तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे. त्याव्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे चिंचवड व भोसरी विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत, असा ठराव शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला. त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले.


या ठरावामुळे आता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय चर्चांना उत आला असून महायुतीत देखिल कलगीतुरा रंगला आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी