बीएसएनएलचा जबरदस्त प्लान, मिळणार ५००० जीबी डेटा

मुंबई: बीएसएनएलने खाजगी टेलिकॉम कंपन्यांसाठी आव्हान निर्माण केले आहे. मोबाईल सेवांसह सरकारी कंपनी ब्रॉडबँड प्लानमध्येही मोठी स्पर्धा निर्माण करत आहे. बीएसएनएलने ब्रॉडबँड इंटरनेट युजरसाठी अतिशय फायदेशीर प्लान सादर केले आहेत. यात ५००० जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेमध्ये युजरला २०० एमबीपीएसच्या वेगवान स्पीडने इंटरनेटची सुविधा मिळत आहे.


बीसएनएलचा हा प्लान ९९९ रूपये प्रति महिना उपलब्ध आहे. यात युजरला एका महिन्यासाठी ५००० दीबी इंटरनेट डेटा मिळेल. या योजनेत २०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेटची सुविधा दिली जात आहे. डेटा संपल्यानंतर युजरला १० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. या प्लानची खास बाब म्हणजे बीएसएनएल इन्स्टॉलेशन चार्ज घेत नाही आहे. यामुळे कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही ब्रॉडबँड सेवेचा आनंद घेऊ शकता.



अनेक ओटीटी अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन


याशिवाय बीएसएनएल या ब्रॉडबँड प्लानसोबत युजरला अनेक ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. युजरला Disney Plus Hotstar, Sony LIV, Zee5, YuppTV, आणि Hungama सारख्या प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच या योजनेत संपूर्ण देशात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक