या गोष्टींवर टॉयलेट सीटपेक्षाही ४०० पटीने अधिक असतात किटाणू

मुंबई: तज्ञांच्या मते घरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात घाण असते. रिमोट, मोबाईल, चॉपिंग बोर्डसारख्या गोष्टींवर टॉयलेट सीटपेक्षाही अधिक बॅक्टेरिया असतात.



कटिंग बोर्ड


कटिंग अथवा चॉपिंग बोर्डावर सर्वाधिक किटाणू असतात. ही वस्तू खाण्याशी अधिक संबंधित असता. त्यामुळे फंगस आणि बॅक्टेरिया जमा होण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे कटिंग बोर्ड नियमितपणे साफ करत राहा आणि चांगला सुकवा.



रिमोट


टीव्ही, गेम्ससाठी रिमोट खूप उपयोगाचा असतो. प्रत्येक घरात रिमोट आढळतो. अनेकदा खाता-पिताना रिमोटला हात लावला जातो. यामुळे रिमोटवर बॅक्टेरिया जमा होतात. जे सहजरित्या आपल्या शरीरात पोहोचतात. यामुळे रिमोट नियमितपणे साफ करत राहा.



स्मार्टफोन


आजकाल चोवीस तास प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. रात्रंदिवस, झोपताना उठताना मोबाईलमध्ये असतात. एका स्टडीनुसार मोबाईलमध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत १० पटीने अधिक घाण असते. मात्र अनेकजण याला साफ करत नाही. यामुळे हे बॅक्टेरिया स्क्रीनवर येतात आणि नुकसान करतात.



पाण्याची बाटली, दरवाजाचे हँडल


याशिवाय पाण्याची बाटली, दरवाजाचे हँडल, लाईट अथवा फॅनचा स्विच, फ्रीजचा हँडल, बेड अथवा बेडशीट यावर सर्वाधिक घाण असते. यामुळे आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा साफ केले गेले पाहिजेत.



डेस्क, कीबोर्ड आणि माऊस


अनेकजण दिवसभरत लॅपटॉप-डेस्कटॉपवर काम केल्यानंतरही अनेकदा याची साफसफाई केली जात नाही. दिवसभर या गोष्टींना कोणत्या ना कोणत्या गोष्टीने हात लावला जातो. यामुळे किटाणू शरीरात पोहोचू शकतात. एका स्टँडर्ड डेस्कमध्ये टॉयलेट सीटपेक्षा ४०० पटींनी अधिक किटाणू असतात.
Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे