Sanjay Patil : कोकणात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना भांडुप स्थानकात थांबा द्यावा!

खासदार संजय दिना पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी


मुंबई : मुंबईत (Mumbai) भांडुप ते विक्रोळी दरम्यान लाखो कोकणवासी राहतात. त्यांना कोकणात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) किंवा दिवा रेल्वे स्थानकावर जावे लागते. याचा सर्वाधीक त्रास महिला, लहान मुले व वृद्धाना होतो. यासाठी भांडुप रेल्वे स्थानकात कोकणला जाणा-या व येणा-या सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा, तसेच दोन्ही प्लॅटफार्मची लांबी वाढविण्यात यावी, अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी रेल्वे (Railway) प्रशासनाकडे केली आहे.


खा. संजय पाटील हे २००९ ते २०१४ या दरम्यान खासदार असताना त्यांनी कोकणात जाणा-या व येणा-या सर्व गाड्यांना भांडुप रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत रेल्वेच्या महाव्यवस्थापका बरोबर झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की सर्वे करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.


मात्र आजगायत याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने खा. संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करीत ही मागणी केली आहे. याचा फायदा मुलुंड, भांडुप तसेच कांजुर व विक्रोळी भागात राहणा-या कोकणवासीय प्रवाशांना होणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई