Mumbai News : मुंबईत सोने-हिऱ्यांच्या तस्करीत ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त!

  96

मुंबई : सोने आणि हिऱ्यांची तस्करी प्रकरणी मुंबईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त केले, ज्यात सोन्याची किंमत अंदाजे १.५८ कोटी रुपये आणि हिऱ्यांची किंमत १.५४ कोटी रुपये आहे. या प्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त (Gold Seized) करण्यात आला आहे.


मुंबई सीमाशुल्क विभागाने पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला थांबवण्यात आलं आणि त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यात २४ कॅरेट सोन्याचे १२ बार (एकूण वजन १४०० ग्रॅम), अंदाजे किंमत ९७,००,२३६ रुपये आहे. हे सोने प्रवाशाने पॅन्टच्या बेल्टजवळ लपवले होते.


चौकशी दरम्यान प्रवाशानं सांगितलं की, हे कृत्य त्याच विमानामधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केलं आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.


दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाला थांबवून त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये दोन २४ कॅरेट सोन्याच्या बांगड्या (एकूण वजन ८८६ ग्रॅम, किमतीचे ६१,३८,८६४ रुपये), रोलेक्स घड्याळ (१३,७०,५२० रुपये किमतीचे) होते. तर १,५४,१८,५७५ रुपये किमतीचे हिरे जप्त करण्यात आले. सोने, रोलेक्स घड्याळ प्रवाशाने परिधान केले होते, तर हिरे प्रवाशाने परिधान केलेल्या बनियानच्या आत एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. या प्रकरणी त्या प्रवाशाला अटकही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

रिअलमी पी 4 सिरीज २० ऑगस्टला भारतात होणार लाँच

मुंबई : रिअलमी कंपनी २० ऑगस्ट २०२५ रोजी भारतात आपली नवी रिअलमी P4 स्मार्टफोन सिरीज बाजारात आणत

राज्यात मुसळधार पावसाने सहा जणांचा बळी, पुण्यासाठी रेड अलर्ट

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने थैमान घातले असून विविध दुर्घटनांत सहा जणांचा मृत्यू झाल्याची

Chintamani First Look: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर, संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृतीने वेधले लक्ष

मुंबई: मुंबईतील मानाच्या गणपतीमधील एक असलेला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. आज सकाळी

विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका

मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद

संघाची दिल्लीत दोन दिवस बैठक

संलग्न संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार मुंबई : अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली