Doctor Strike : मागण्या मान्य झाल्याने ४१ दिवसानंतर डॉक्टरांचा संप मागे

  89

आजपासून हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवा पुन्हा होणार सुरु


नवी दिल्ली : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप सुरु केला होता. दरम्यान, तब्बल ४१ दिवसांनतर सुरू असलेला संप मागे घेत असल्याची घोषणा ज्युनियर डॉक्टरांनी केली आहे. २१ सप्टेंबरपासून हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू करणार आहेत. मात्र, ओपीडी सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे.


शनिवारपासून डॉक्टर आपत्कालीन सेवा देण्यास सुरुवात करतील. ते सध्या आउटडोअर आणि इनडोअर सेवांमध्ये सहभागी होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत गुरुवारी राज्यातील वरिष्ठ डॉक्टरांनीही कनिष्ठ डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.



सरकारने डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या केल्या मान्य


पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टरांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आंदोलक ज्युनिअर डॉक्टरांनी शनिवारपासून आपले आंदोलन अंशत: संपवून सरकारी रुग्णालयांना सेवा देण्याचे जाहीर केले आहे. महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर डॉक्टरांनी गेल्या ४१ दिवसांपासून कामबंद आंदोलन केले. आंदोलन संपवण्यापूर्वी ते राज्य आरोग्य विभागाच्या मुख्यालय स्वास्थ्य भवन ते सॉल्ट लेक परिसरातील सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील. एका आंदोलक डॉक्टराने त्यांच्या सर्वसाधारण सभेनंतर सांगितले की, पश्चिम बंगालमधील पूरस्थिती लक्षात घेता आणि राज्य सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्याने आम्ही शनिवारपासून आपत्कालीन सेवा सुरु करत असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन