Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागात राहणार पाणीपुरवठा बंद

ठाणे : गणेशोत्सवानंतर महापालिकेने (Municipality) अनेक भागातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम (Repairing) पुन्हा हाती घेतले आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच पाण्याचा जास्तीचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. कालच पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागात दुरुस्तीच्या कामामुळे त्या परिसरातील नागरिकांना दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. त्यानंतर आता ठाण्यातही (Thane) पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास २४ तासांचा कालावधी लागणार असून उद्या संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.



कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद?


ठाणे महापालिकेअंतर्गत प्रभाग २६ व ३१ चा काही भाग वगळता दिवा, मुंब्रा यासह कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

Comments
Add Comment

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील