Indian Railway News: धक्कादायक! कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन धावली उलट्या दिशेने

  95

कोलकाता : जगामध्ये रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेमधून (Indian Railway) दररोज कोट्यवधीनी लोक प्रवास करत असतात. भारतामधील रेल्वे हे प्रवासाचं एक स्वस्त आणि सुरक्षित माध्यम मानलं जातं. मात्र काही घटना अशासुद्धा घडत असतात. ज्याच्यामुळे रेल्वे प्रशासनावर नामुष्की ओढावत असते. आता अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कोलकात्यावरून (Kolkata) अमृतसरकडे (Amritsar) जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे.


धक्कादायक बाब अशी की, ही ट्रेन जालंधर स्टेशनपासून सुमारे ३० मिनिटांपर्यंत उलट्या दिशेने धावत राहिली. नकोरडा जंक्शन येथे ३० मिनिटांनंतर पोहोचल्यावर ट्रेन चुकीच्या दिशेला जात असल्याचं ड्रायव्हरला लक्षात आलं. त्यानंतर इंजिन बदलून ट्रेन परत आपल्या मार्गावर आणण्यात आली. या दरम्यान, ट्रेनमधून प्रवास करत असलेले प्रवाशी प्रचंड घाबरून गेले. तसेच सोशल मीडियावरून अनेकांनी या घटनेबाबत सावालही उपस्थित केले. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.


दरम्यान, भारतीय रेल्वे मार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. त्यानंतर वृंदावन रेल्वे स्टेशनपासून सुमारे ८०० मीटर पुढे एका मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तर बिहारच्या मुझफ्फरपूरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. तिथे मालगाडीचे काही डबे रुळांवरून उतरले होते. या अपघातात कुठलीही हानी झाल्याचं वृत्त नाही.




Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके