Indian Railway News: धक्कादायक! कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन धावली उलट्या दिशेने

कोलकाता : जगामध्ये रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेमधून (Indian Railway) दररोज कोट्यवधीनी लोक प्रवास करत असतात. भारतामधील रेल्वे हे प्रवासाचं एक स्वस्त आणि सुरक्षित माध्यम मानलं जातं. मात्र काही घटना अशासुद्धा घडत असतात. ज्याच्यामुळे रेल्वे प्रशासनावर नामुष्की ओढावत असते. आता अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कोलकात्यावरून (Kolkata) अमृतसरकडे (Amritsar) जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे.


धक्कादायक बाब अशी की, ही ट्रेन जालंधर स्टेशनपासून सुमारे ३० मिनिटांपर्यंत उलट्या दिशेने धावत राहिली. नकोरडा जंक्शन येथे ३० मिनिटांनंतर पोहोचल्यावर ट्रेन चुकीच्या दिशेला जात असल्याचं ड्रायव्हरला लक्षात आलं. त्यानंतर इंजिन बदलून ट्रेन परत आपल्या मार्गावर आणण्यात आली. या दरम्यान, ट्रेनमधून प्रवास करत असलेले प्रवाशी प्रचंड घाबरून गेले. तसेच सोशल मीडियावरून अनेकांनी या घटनेबाबत सावालही उपस्थित केले. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.


दरम्यान, भारतीय रेल्वे मार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. त्यानंतर वृंदावन रेल्वे स्टेशनपासून सुमारे ८०० मीटर पुढे एका मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तर बिहारच्या मुझफ्फरपूरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. तिथे मालगाडीचे काही डबे रुळांवरून उतरले होते. या अपघातात कुठलीही हानी झाल्याचं वृत्त नाही.




Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी