जगातील ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत भारतातील हे हॉटेल, एका रात्रीचा खर्च ऐकून व्हाल हैराण

मुंबई: भारतात ट्रॅव्हल आणि टूरिझ्मचे सेक्टर वेगाने वाढत आहे. याचे नुकतेच उदाहरण म्हणजे एका भारतीय हॉटेलने जगभरातील ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत स्थान मिळवले आहे.


हे २०२४मध्ये ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय हॉटेल आहे. या लिस्टमध्ये या हॉटेलने ४३वे स्थान मिळवले आहे.


आम्ही ज्या हॉटेलबद्दल बोलत आहोत ते आहे राजस्थानातील सुझान जवाई हॉटेल. हे एक लक्झरी सफारी कँप हॉटेल आहे. सुझान जवाईच्या तीन शाखा आहे. हे राजस्थानच्या जवाई बंध, जैसलमेर आणि सवाई माधेपुर स्थित आहे.


सुझान जवाईमध्ये राहणाऱ्यांना कँपिंगसोबत वाईल्डलाईफची मजाही दिली जाते. येथे थांबणाऱ्या पर्यटकांना चित्त्यापासून ते जंगलात राहणाऱे इतर प्राणीही पाहायला मिळतात.


येथे पर्यटकांना लक्झरियस रुमच्या ऐवजी लक्झरियस कँपमध्ये थांबण्याची सोय केलेली असते. यात त्यांना विविध सोयीसुविधा मिळतात. सुजान जवाईमध्ये थांबण्यासाठी आधीच बुकिंग करावी लागते.


येथे २ रात्री थांबण्यासाठीची किंमत १,७२,००० रूपयांपासून ते २,५०,००० रूपयांपर्यंत असू शकते. येथे तुम्हाला कमीत कमी २ रात्रींचा स्टे करणे गरजेचे असते.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका