मीरा भाईंदरमध्ये उबाठाला खिंडार! उप जिल्हाप्रमुखासह शेकडो पदाधिकारी भाजपात

भाईंदर : शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख तसेच मीरा भाईंदर मधील दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले शंकर वीरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपात प्रवेश केला आहे.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात एकीकडे ढोल ताशे वाजवत गणेश विसर्जन होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचा ढाण्या वाघ समजला जाणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख शंकर वीरकर आणि युवती सेना विधानसभा अधिकारी आकांक्षा वीरकर यांनी आपल्या १८५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते तसेच माजी उप महापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेते प्रशांत दळवी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात महिला आघाडी आणि युवती सेना सुध्दा मोठ्या संख्येने होती.


शंकर वीरकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये उबाठाला प्रचंड खिंडार पडले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली आणि गणेश विसर्जन असूनही त्यांच्या निवासस्थानी मोठी रीघ लागली. वीरकर गेली २९ वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. कुस्ती संघटनासह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेशी संबंधित असुन मीरा भाईंदर मधील शिवसेना वाढीस त्यांचा मोठा सहभाग होता.

Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास