मीरा भाईंदरमध्ये उबाठाला खिंडार! उप जिल्हाप्रमुखासह शेकडो पदाधिकारी भाजपात

भाईंदर : शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख तसेच मीरा भाईंदर मधील दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले शंकर वीरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपात प्रवेश केला आहे.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात एकीकडे ढोल ताशे वाजवत गणेश विसर्जन होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचा ढाण्या वाघ समजला जाणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख शंकर वीरकर आणि युवती सेना विधानसभा अधिकारी आकांक्षा वीरकर यांनी आपल्या १८५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते तसेच माजी उप महापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेते प्रशांत दळवी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात महिला आघाडी आणि युवती सेना सुध्दा मोठ्या संख्येने होती.


शंकर वीरकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये उबाठाला प्रचंड खिंडार पडले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली आणि गणेश विसर्जन असूनही त्यांच्या निवासस्थानी मोठी रीघ लागली. वीरकर गेली २९ वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. कुस्ती संघटनासह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेशी संबंधित असुन मीरा भाईंदर मधील शिवसेना वाढीस त्यांचा मोठा सहभाग होता.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने