मीरा भाईंदरमध्ये उबाठाला खिंडार! उप जिल्हाप्रमुखासह शेकडो पदाधिकारी भाजपात

भाईंदर : शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख तसेच मीरा भाईंदर मधील दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले शंकर वीरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपात प्रवेश केला आहे.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात एकीकडे ढोल ताशे वाजवत गणेश विसर्जन होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचा ढाण्या वाघ समजला जाणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख शंकर वीरकर आणि युवती सेना विधानसभा अधिकारी आकांक्षा वीरकर यांनी आपल्या १८५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते तसेच माजी उप महापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेते प्रशांत दळवी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात महिला आघाडी आणि युवती सेना सुध्दा मोठ्या संख्येने होती.


शंकर वीरकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये उबाठाला प्रचंड खिंडार पडले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली आणि गणेश विसर्जन असूनही त्यांच्या निवासस्थानी मोठी रीघ लागली. वीरकर गेली २९ वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. कुस्ती संघटनासह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेशी संबंधित असुन मीरा भाईंदर मधील शिवसेना वाढीस त्यांचा मोठा सहभाग होता.

Comments
Add Comment

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना