Lalbaugcha Raja Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या! २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला भाविकांचा निरोप

मुंबई : 'ही शान कोणाची, लालबागच्या राजा'ची अशा निनादात काल सकाळी मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja Visarjan 2024)  अखेर २३ तासांनी विसर्जन झालं आहे. गिरगाव चौपाटीवर महाआरती करून बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती.


दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात मुंबई पुण्यासह सर्व भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाहेर पडले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. मुंबई लालबाग परिसरातील केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या लालबागच्या राजामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्ते खुलून गेले होते.



असं झालं राजाचं विसर्जन


राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आज सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर बाप्पाची दिमाखात महाआरती करण्यात आली. त्यानंतर राजाला विसर्जनाच्या दिशेकडे नेण्यात आले आणि राजाला तराफ्यावर बसवण्यात आले. यावेळी कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची सलामी देण्यात आली. समुद्राच्या मध्यभागी तरफा थांबवण्यात आला. अत्याधुनिक तराफ्यातून राजाची मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्यात आली. यावेळी प्रत्येक भाविकाचे डोळे पाणावले होते.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र