CBSC Education : सरकारी शाळांमध्ये लागणार सीबीएससी पॅटर्न; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

दीपक केसरकर यांनी सांगितला आराखडा


मुंबई : सध्या अनेक पालक त्यांच्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या (CBSC Education) शाळांमध्ये शिक्षण देत आहेत. शिक्षणाकडे राज्यातील पालकांचा ओढा वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम सरकारी शाळांवर पडत असल्याचे दिसून येत आहे. सीबीएससी बोर्डातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे. या कारणांमुळे सरकारी शाळाना ओस पडत असल्याने ही बाब लक्षात घेता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात नवा पॅटर्न लागणार असून राज्यातील विद्यार्थ्यांना याचा चांगलाच शैक्षणिक फायदा होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडू नयेत, यासाठी शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी अभ्यास पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे आता राज्य शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्डा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.



काय म्हणाले दीपक केसरकर?


एका पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केला असल्याचे म्हटले आहे. सीबीएससी शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्या शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, सीबीएससी पॅटर्न असला तरीही अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच याआधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय निवडणे बंधनकारक असणार आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; लोहगडावर सिया गोयलकडून पोलिसांनी केले सीन रिक्रिएशन

पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील