Diabetes: या कारणामुळे लहान मुलांमध्ये वाढत आहे डायबिटीज

मुंबई: डायबिटीज सध्याच्या जीवनशैलीमध्ये सर्वात मोठ्या समस्यापैकी एक आहे. भारतात अनेक लोक याचा सामना करत आहेत. आतापर्यंत हा आजार केवळ मोठ्या माणसांमध्ये आढळत होता. मात्र आता या आजाराचा विळखा लहान मुलांनाही बसत आहे. यामागचे कारण आहे ते म्हणजे खराब लाईफस्टाईल. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी डायबिटीजचे कारण बनत आहे.


गेल्या काही वर्षांमध्ये डायबिटीज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुलांमध्ये प्रामुख्याने टाईप १ डायबिटीजचा धोका आढळत आहे तर काही मुलांमध्ये टाईप २ डायबिटीज आढळत आहे. कमी वयात मधुमेहाच्या समस्या, अनेक प्रकारच्या गुंतागुंतीमुळे क्वालिटी ऑफ लाईफ खराब होत आहे.



मुलांमध्ये डायबिटीजची ही लक्षणे आढळतात


सतत बाथरूमला जाणे
मूत्राशयामध्ये संसर्ग होणे
जखम लवकर बरी न होणे
खूप तहान लागणे
थकवा आणि धुंद डोळे
रक्तात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असणे
उलटीसारखे वाटणे



डायबिटीज रोखण्यासाठी काय करावे


मुलांना निरोगी जेवणाचे महत्त्व समजावून द्या. जंक फूडपासून दूर ठेवा. खाताना स्क्रीनपासन दूर ठेवा. अधिक पाणी पिणे. फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करणे. हळू हळू खाणे. कुटुंबासोबत जेवण करा.


आपल्या मुलाला कमीत कमी ६० मिनिटांच्या फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये सामील करा. यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहील आणि डायबिटीजपासून वाचता येईल.


मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. यामुळे अभ्यासात मन लागेल. लोकांशी कनेक्ट करा.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका