Diabetes: या कारणामुळे लहान मुलांमध्ये वाढत आहे डायबिटीज

मुंबई: डायबिटीज सध्याच्या जीवनशैलीमध्ये सर्वात मोठ्या समस्यापैकी एक आहे. भारतात अनेक लोक याचा सामना करत आहेत. आतापर्यंत हा आजार केवळ मोठ्या माणसांमध्ये आढळत होता. मात्र आता या आजाराचा विळखा लहान मुलांनाही बसत आहे. यामागचे कारण आहे ते म्हणजे खराब लाईफस्टाईल. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी डायबिटीजचे कारण बनत आहे.


गेल्या काही वर्षांमध्ये डायबिटीज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुलांमध्ये प्रामुख्याने टाईप १ डायबिटीजचा धोका आढळत आहे तर काही मुलांमध्ये टाईप २ डायबिटीज आढळत आहे. कमी वयात मधुमेहाच्या समस्या, अनेक प्रकारच्या गुंतागुंतीमुळे क्वालिटी ऑफ लाईफ खराब होत आहे.



मुलांमध्ये डायबिटीजची ही लक्षणे आढळतात


सतत बाथरूमला जाणे
मूत्राशयामध्ये संसर्ग होणे
जखम लवकर बरी न होणे
खूप तहान लागणे
थकवा आणि धुंद डोळे
रक्तात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असणे
उलटीसारखे वाटणे



डायबिटीज रोखण्यासाठी काय करावे


मुलांना निरोगी जेवणाचे महत्त्व समजावून द्या. जंक फूडपासून दूर ठेवा. खाताना स्क्रीनपासन दूर ठेवा. अधिक पाणी पिणे. फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करणे. हळू हळू खाणे. कुटुंबासोबत जेवण करा.


आपल्या मुलाला कमीत कमी ६० मिनिटांच्या फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये सामील करा. यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहील आणि डायबिटीजपासून वाचता येईल.


मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. यामुळे अभ्यासात मन लागेल. लोकांशी कनेक्ट करा.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि