फिरण्यासाठी खूप स्वस्त आहेत हे ५ देश

मुंबई: फिरण्याचे शौकीन असलेल्यांसाठी परदेशात फिरायला जाणे हे जणू स्वप्नवत आसते. मात्र अनेकदा आपल्या बँक बॅलन्समुळे आपल्याला फिरता येत नाही आणि फॉरेन ट्रिप साकारता येत नाही. जर तुमच्यासोबतही असेच होते तर आम्ही तुम्हाला ५ अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही ३० हजार रूपयांच्या आत अगदी आरामात परदेशात फिरू शकता.



नेपाळ


नेपाळची राजधानी काठमांडू फिरण्यासाठी अतिशय सुंदर बजेट फ्रेंडली ठिकाण आहे. काठमांडूमध्ये सास्कृंतिक, जुनी मंदिरे तसेच रंगीबेरंगी बाजार तुम्हाला नक्कीच आवडतील. पोखराचे नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील रोमहर्षक स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. येथे फिरण्यासाठी तुम्हाला २०-३० हजारांचा खर्च येईल.



श्रीलंका


श्रीलंकाची राजधानी कोलंबोमध्ये ऐतिहासिक इमारती, तेथील चमचमणारे गल्लीबोळ, रंगीबेरंगी मार्केट आणि तेथील नैसर्गिक सुंदरता नक्कीच आकर्षिक करेल. कँडी शहराजवळील डोंगर, चहाच्या बागा अतिशय सुंदर आहेत. श्रीलंकेत फिरण्यासाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येईल.



थायलंड


थायलंडमध्ये तुम्ही बँकॉक आणि पट्टाया या शहरांमध्ये फिरू शकता. बँकॉकचे बाजार आणि पटाया शहरातील समुद्र किनारे अतिशय सुंदर आहेत. येथे फिरण्यासाठी २५-३० हजार खर्च येईल.



दुबई


जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा असलेला देश दुबईमध्ये फिरण्याचा अनुभव वेगळाच असेल. येथे तुम्ही मॉलमध्ये फिरू शकता तसेच रेगिस्तानमध्ये उंटस्वारी करू शकता. येथे फिरण्याचा खर्च २५-३० हजार येईल.



मलेशिया


मलेशियाची राजधानी क्वालांलपूरमध्ये तुम्ही petronas टॉवर्सवर जाऊन शहराची उंची पाहू शकता. येथील batu गुहा आणि मंदिरांमध्येही फिरू शकता.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी