Ganeshotsav : भिवंडीत कोंबडपाडा, पद्मानगर आणि प्रभू आळीतील गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार!

  91

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

भिवंडी : भिवंडी शहरातील ओमकार मित्र मंडळ कोंबडपाडा, जयहिंद मित्र मंडळ पद्मानगर, सार्वजनिक गणेशोत्सव गणपती मंदिर, प्रभू आळी या मंडळांना महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते अनुक्रमे तीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी व अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा (Ganeshotsav) विशेष सन्मान करण्यात आला.


एकात्मतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्था आयोजित गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी रशीद, भाजपा शहराध्यक्ष अॅड हर्षल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी स्वाभिमान सेवा संस्थेचे संस्थाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्यासह मंडळाच्या कार्याचे रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली