Amit Shah : दहशतवाद जमिनीत गाडून टाकू- अमित शाह

किश्तवाड : जम्मू-काश्मिरातील विरोधी पक्ष हे कुटुंब केंद्रीत राजकारण करणारे आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना राज्यात दहशतवाद वाढवायचा आहे. परंतु, भाजपा सरकार सत्तेत आल्यास दहशतवाद (terrorism) जमिनीत गाडून टाकू असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.


जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर 'आपल्या कुटुंबाचे सरकार' बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर येऊ शकत नसल्याचे शाह म्हणाले. याशिवाय, ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांना राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत गाडून टाकेल असे शाह यांनी सांगितले.


काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा दहशतवादाकडे ढकलायचे आहे, असे सांगत अमित शाह म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आले तर दहशतवाद सुरू होईल. मी तुम्हाला वचन देतो. आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. आम्ही दहशतवादाला अशा स्तरावर गाडून टाकण्याचा संकल्प केला आहे की, तो परत येऊ शकत नाही." याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण पाहत असल्याचे सांगत ना अब्दुल्लांचं सरकार बनतंय ना राहुल गांधींचं सरकार. यावेळी खोऱ्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शाह यांनी केला.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या