Amit Shah : दहशतवाद जमिनीत गाडून टाकू- अमित शाह

  84

किश्तवाड : जम्मू-काश्मिरातील विरोधी पक्ष हे कुटुंब केंद्रीत राजकारण करणारे आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना राज्यात दहशतवाद वाढवायचा आहे. परंतु, भाजपा सरकार सत्तेत आल्यास दहशतवाद (terrorism) जमिनीत गाडून टाकू असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.


जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर 'आपल्या कुटुंबाचे सरकार' बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर येऊ शकत नसल्याचे शाह म्हणाले. याशिवाय, ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांना राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत गाडून टाकेल असे शाह यांनी सांगितले.


काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा दहशतवादाकडे ढकलायचे आहे, असे सांगत अमित शाह म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आले तर दहशतवाद सुरू होईल. मी तुम्हाला वचन देतो. आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. आम्ही दहशतवादाला अशा स्तरावर गाडून टाकण्याचा संकल्प केला आहे की, तो परत येऊ शकत नाही." याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण पाहत असल्याचे सांगत ना अब्दुल्लांचं सरकार बनतंय ना राहुल गांधींचं सरकार. यावेळी खोऱ्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शाह यांनी केला.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.