Amit Shah : दहशतवाद जमिनीत गाडून टाकू- अमित शाह

किश्तवाड : जम्मू-काश्मिरातील विरोधी पक्ष हे कुटुंब केंद्रीत राजकारण करणारे आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना राज्यात दहशतवाद वाढवायचा आहे. परंतु, भाजपा सरकार सत्तेत आल्यास दहशतवाद (terrorism) जमिनीत गाडून टाकू असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.


जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर 'आपल्या कुटुंबाचे सरकार' बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर येऊ शकत नसल्याचे शाह म्हणाले. याशिवाय, ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांना राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत गाडून टाकेल असे शाह यांनी सांगितले.


काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा दहशतवादाकडे ढकलायचे आहे, असे सांगत अमित शाह म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आले तर दहशतवाद सुरू होईल. मी तुम्हाला वचन देतो. आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. आम्ही दहशतवादाला अशा स्तरावर गाडून टाकण्याचा संकल्प केला आहे की, तो परत येऊ शकत नाही." याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण पाहत असल्याचे सांगत ना अब्दुल्लांचं सरकार बनतंय ना राहुल गांधींचं सरकार. यावेळी खोऱ्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शाह यांनी केला.

Comments
Add Comment

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण

मोबाईल गेमची सवय जीवघेणी ठरली, पॉप्युलर गेम खेळताना मुलाचा प्राण गेला

लखनऊ: मोबाईल गेमच्या व्यसनामुळे एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

Garib Rath Express Fire : गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग! 'ज्वाळा' पाहून प्रवाशांना फुटला घाम; अनेकजण जखमी, रेल्वेने दिली 'ही' माहिती

अमृतसर : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आज, शनिवारी, सकाळी अचानक मोठा गोंधळ आणि अफरातफरी माजली. लुधियानाहून

Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने

'अत्याधुनिक विमानाचे उड्डाण हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक', संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार

नाशिक: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाच्या 'तेजस एमके 1 ए' च्या