Indigo Flight Canceled : हवाई प्रवाशांचा संताप! ६ तासांच्या विलंबानंतर मुंबई-दोहा इंडिगो विमान रद्द

मुंबई : मुंबईतील इंडिगो एअरलाईन्सबाबत (Indigo Flight) सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. अशातच आज इंडिगो विमानतळावर हवाई प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबइहून दोहा-कतारला जाणारे इंडिगोचे विमान तब्बल ६ तासानंतर रद्द (Flight Canceled) करण्यात आले. त्यामुळे या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी इंडिगोबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास उड्डाण करणार होते. मात्र विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान ६ तासांनंतर रद्द करण्यात आले.


या विमानात २०० ते ३०० प्रवासी होते. प्रवाशांना विमानात चढवल्यानंतर विमान तासनतास विमानतळावरच उभे होते. सुमारे ५ तास प्रवाशांनी विमान उड्डाण होण्याची वाट पाहिली तसेच त्यांना विमानातून उतरण्याची परवानगी देखील दिली नव्हती. परंतु प्रवाशांचा संताप वाढल्यावर क्रू मेंबर्सनी त्यांना फ्लाइटमधून उतरण्याची परवानगी दिली आणि इमिग्रेशन वेटिंग एरियामध्ये नेले. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले.



प्रवाशांचा संताप


प्रवाशाने असा दावा केला की, या काळात त्याला पाणी आणि अन्नही मिळाले नाही.



इंडिगोने काय म्हटले?


इंडिगो एअरलाइन्सने या प्रकाराबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, 'आम्ही विमान एकदा किंवा दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यामुळे आम्ही फ्लाइट रद्द केली आहे. पुढील फ्लाइटसाठी रिबुकिंग केले जात आहे. तसेच विमानतळावरील आमच्या टीमने त्यांना खाद्यपदार्थ पुरवले आणि प्रत्येक गरजेमध्ये मदत केली. प्रवाशांसाठी हॉटेल्सही बुक केली जात आहेत'.

Comments
Add Comment

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका