Indigo Flight Canceled : हवाई प्रवाशांचा संताप! ६ तासांच्या विलंबानंतर मुंबई-दोहा इंडिगो विमान रद्द

मुंबई : मुंबईतील इंडिगो एअरलाईन्सबाबत (Indigo Flight) सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. अशातच आज इंडिगो विमानतळावर हवाई प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबइहून दोहा-कतारला जाणारे इंडिगोचे विमान तब्बल ६ तासानंतर रद्द (Flight Canceled) करण्यात आले. त्यामुळे या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी इंडिगोबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास उड्डाण करणार होते. मात्र विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान ६ तासांनंतर रद्द करण्यात आले.


या विमानात २०० ते ३०० प्रवासी होते. प्रवाशांना विमानात चढवल्यानंतर विमान तासनतास विमानतळावरच उभे होते. सुमारे ५ तास प्रवाशांनी विमान उड्डाण होण्याची वाट पाहिली तसेच त्यांना विमानातून उतरण्याची परवानगी देखील दिली नव्हती. परंतु प्रवाशांचा संताप वाढल्यावर क्रू मेंबर्सनी त्यांना फ्लाइटमधून उतरण्याची परवानगी दिली आणि इमिग्रेशन वेटिंग एरियामध्ये नेले. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले.



प्रवाशांचा संताप


प्रवाशाने असा दावा केला की, या काळात त्याला पाणी आणि अन्नही मिळाले नाही.



इंडिगोने काय म्हटले?


इंडिगो एअरलाइन्सने या प्रकाराबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, 'आम्ही विमान एकदा किंवा दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यामुळे आम्ही फ्लाइट रद्द केली आहे. पुढील फ्लाइटसाठी रिबुकिंग केले जात आहे. तसेच विमानतळावरील आमच्या टीमने त्यांना खाद्यपदार्थ पुरवले आणि प्रत्येक गरजेमध्ये मदत केली. प्रवाशांसाठी हॉटेल्सही बुक केली जात आहेत'.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना