Indigo Flight Canceled : हवाई प्रवाशांचा संताप! ६ तासांच्या विलंबानंतर मुंबई-दोहा इंडिगो विमान रद्द

मुंबई : मुंबईतील इंडिगो एअरलाईन्सबाबत (Indigo Flight) सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. अशातच आज इंडिगो विमानतळावर हवाई प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबइहून दोहा-कतारला जाणारे इंडिगोचे विमान तब्बल ६ तासानंतर रद्द (Flight Canceled) करण्यात आले. त्यामुळे या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी इंडिगोबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास उड्डाण करणार होते. मात्र विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान ६ तासांनंतर रद्द करण्यात आले.


या विमानात २०० ते ३०० प्रवासी होते. प्रवाशांना विमानात चढवल्यानंतर विमान तासनतास विमानतळावरच उभे होते. सुमारे ५ तास प्रवाशांनी विमान उड्डाण होण्याची वाट पाहिली तसेच त्यांना विमानातून उतरण्याची परवानगी देखील दिली नव्हती. परंतु प्रवाशांचा संताप वाढल्यावर क्रू मेंबर्सनी त्यांना फ्लाइटमधून उतरण्याची परवानगी दिली आणि इमिग्रेशन वेटिंग एरियामध्ये नेले. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले.



प्रवाशांचा संताप


प्रवाशाने असा दावा केला की, या काळात त्याला पाणी आणि अन्नही मिळाले नाही.



इंडिगोने काय म्हटले?


इंडिगो एअरलाइन्सने या प्रकाराबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, 'आम्ही विमान एकदा किंवा दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यामुळे आम्ही फ्लाइट रद्द केली आहे. पुढील फ्लाइटसाठी रिबुकिंग केले जात आहे. तसेच विमानतळावरील आमच्या टीमने त्यांना खाद्यपदार्थ पुरवले आणि प्रत्येक गरजेमध्ये मदत केली. प्रवाशांसाठी हॉटेल्सही बुक केली जात आहेत'.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.