Mumbai Local : मुंबईकरांची रेल्वे गर्दीतून होणार सुटका; दुप्पट वाढणार लोकल ट्रेन फेऱ्या!

रेल्वे प्रशासनाने आखला नवा प्लॅन


मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेन (Mumbai Local) प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की आगामी तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या दुप्पट होणार असून, दोन लोकलमधील अंतर १८० सेकंदांवरून १५० सेकंदांवर आणले जाईल. यासाठी कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन धावेल, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गर्दी कमी होईल.


मुंबईतील तिन्ही मार्गांवर ही प्रणाली लागू होणार आहे. सध्या, तांत्रिक अडचणी आणि वेळापत्रकातील अनियमितता यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, CBTC प्रणालीमुळे हे प्रश्न सुटतील आणि ट्रेन सेवा अधिक नियमित आणि वेगवान होईल. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.


याशिवाय, ट्रेनच्या सुरक्षिततेसाठी कवच अँटी-कोलिजन तंत्र देखील वापरले जाणार आहे, जे अपघातांचा धोका कमी करेल. CBTC आणि कवच यंत्रणांच्या संयुक्त वापरामुळे ट्रेनमधील अंतर कमी होईल, अपघात टाळता येतील, आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल. हा प्रकल्प मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (MUTP) फेज 3A अंतर्गत राबवला जात आहे, जो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने विकसित केला आहे.


ही प्रणाली येत्या काही महिन्यांत अंमलात येईल, आणि त्यानंतर मुंबईतील प्रवास जलद, अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल. प्रवाशांना अडीच मिनिटांच्या अंतराने उपलब्ध होणाऱ्या ट्रेनमुळे त्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर होईल.

Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई