रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भांडुपच्या परिसरात अपघाताची भीती

भांडुप : भांडुपमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेले असून दुचाकी वाहनचालकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी पडलेल्या रस्त्यावरील भेगा लवकरात लवकर बुजवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवण्यावर बंदी घातली असतानादेखील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीच्या नावाखाली पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवल्याचे दिसून येते.


भांडुप (प.) रेल्वे स्थानक परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकीचे अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भांडुप पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. याच परिसरात असलेल्या पार्किंगसाठी येणाऱ्या दुचाकी वाहनचालकांचा तसेच नागरिकांचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.


काही दिवसांपूर्वीच या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे अपघाताची घटना घडली होती. असे अपघाताचे प्रकार वारंवार घडू नयेत, यासाठी स्टेशन परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरुस्ती न करता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा अथवा डांबरी बनवावा, अशी मागणी वराडे यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे तसेच मध्य रेल्वेच्या भांडुप स्टेशन मास्तरांकडे केली आहे.

Comments
Add Comment

महिलांची डिजिटल बदनामी ठरणार गुन्हा; ३ वर्षांच्या कोठडीची तरतूद

भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक कायदा एकमताने विधान परिषदेत मंजूर मुंबई : सोशल मीडिया किंवा इतर

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा

मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे.

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन होणार; मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आता एक मोठे पाऊल

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे

एसअँडपीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७.१ टक्क्यांपर्यंत वाढवला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील. एस अँड पी

डिजिटल माध्यमांवरील महिलांची बदनामी आता 'लैंगिक गुन्हा'

- 'भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६' विधानसभेत सादर; 'शक्ती' कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा