रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भांडुपच्या परिसरात अपघाताची भीती

भांडुप : भांडुपमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेले असून दुचाकी वाहनचालकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी पडलेल्या रस्त्यावरील भेगा लवकरात लवकर बुजवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवण्यावर बंदी घातली असतानादेखील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीच्या नावाखाली पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवल्याचे दिसून येते.


भांडुप (प.) रेल्वे स्थानक परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकीचे अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भांडुप पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. याच परिसरात असलेल्या पार्किंगसाठी येणाऱ्या दुचाकी वाहनचालकांचा तसेच नागरिकांचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.


काही दिवसांपूर्वीच या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे अपघाताची घटना घडली होती. असे अपघाताचे प्रकार वारंवार घडू नयेत, यासाठी स्टेशन परिसरातील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरुस्ती न करता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा अथवा डांबरी बनवावा, अशी मागणी वराडे यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे तसेच मध्य रेल्वेच्या भांडुप स्टेशन मास्तरांकडे केली आहे.

Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा