Photo gallery : भक्तिमय वातावरणात गौरी विसर्जनाचा सोहळा संपन्न

मुंबई: 'सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला' असे म्हणत माहेरपणासाठी आलेल्या गौराईंना आज भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी घरी आलेल्या गौराईंचे विसर्जन अतिशय भक्तिभावाने करण्यात आले. काही ठिकाणी तर गौरींसह गणपतींचे विसर्जनही पार पडले. गणपतीच्या चौथ्या दिवशी गौरी आवाहन होते. तर सहाव्या दिवशी गौरींचे विसर्जन करण्यात आले.


गौरी विसर्जनाचा सोहळ्याची परंपरा विविध गावांमध्ये वेगवेगळी असते. कुडाळ तालुक्यातील पाट गावातही गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी १२ सप्टेंबरला गौरी विसर्जन अतिशय धामधुमीत पार पडले.



या दिवशी गौरीसाठी केल्या जाणाऱ्या भाजी-भाकरीचा नेवैद्य वाटण्याचा मोठा सोहळाच असतो. या दिवशी मिळणारी भाजी-भाकरीची चव तुम्हाला इतर कोणत्याच दिवशी येणार नाही.



तांदूळ, नाचणी अशा कोणत्याही धान्यांची भाकरी आणि शेवग्याचा पाल्यासह पाच प्रकारचा पाला घालून केलेली स्वादिष्ट भाजी यांचा नैवेद्य यावेळी देवीला अर्पण केला जातो.



पाट गावात याचा मोठा सोहळाच रंगतो. स्त्रिया-पुरूष सारेच या सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. यावेळी पुजेसाठी गौराईची मूर्ती असतेच मात्र हळदीचे रोप ही खरी देवी असते. या देवीचे विहीरीच्या ठिकाणी विसर्जन केले जाते. भजन, आरती म्हणत देवीच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. त्यानंतर प्रत्येक घरातून देवीसाठी आलेला नैवेद्य एकत्र केला जातो आणि संपूर्ण गावात वाटला जातो.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका