Solapur News : उजनी धरणाचे १६ दरवाजे बंद; कॅनॉलचे पाणी १० ऑक्टोबरपर्यंत राहणार सुरु!

  96

सोलापूर : उजनी धरण सध्या १०४ टक्के (११९.३० टीएमसी) भरले असून पूर नियंत्रणासाठी धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. मागील ३७ दिवसांत धरणातून तब्बल ९३ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले. पण, काही दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने भीमा नदीत सोडले जाणारे पाणी आज बंद करण्यात आले आहे. धरणाचे १६ दरवाजे बंद करण्यात आले आहेत.


सध्या उजनीतून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी १७५ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ८० क्युसेक, बोगद्यातून २०० क्युसेक, कालव्यातून (कॅनॉल) १६०० तर विद्युत प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. नदीतून पाणी सोडणे आता पूर्णपणे बंद झाले आहे. सध्या धरणातून सोडले जाणारे पाणी साधारणतः १० ऑक्टोबरपर्यंत जैसे थे राहणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून विहिरी, गाव तलाव, मध्यम, लघू प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.


त्यामुळे आता जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत शेतीसाठी पहिले आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर उन्हाळा संपेपर्यंत आणखी दोन आवर्तने शक्य आहेत. धरणातील पाणीसाठा उणे १५ ते २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात उजनी ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे.

Comments
Add Comment

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच