Solapur News : उजनी धरणाचे १६ दरवाजे बंद; कॅनॉलचे पाणी १० ऑक्टोबरपर्यंत राहणार सुरु!

सोलापूर : उजनी धरण सध्या १०४ टक्के (११९.३० टीएमसी) भरले असून पूर नियंत्रणासाठी धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. मागील ३७ दिवसांत धरणातून तब्बल ९३ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले. पण, काही दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने भीमा नदीत सोडले जाणारे पाणी आज बंद करण्यात आले आहे. धरणाचे १६ दरवाजे बंद करण्यात आले आहेत.


सध्या उजनीतून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी १७५ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ८० क्युसेक, बोगद्यातून २०० क्युसेक, कालव्यातून (कॅनॉल) १६०० तर विद्युत प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. नदीतून पाणी सोडणे आता पूर्णपणे बंद झाले आहे. सध्या धरणातून सोडले जाणारे पाणी साधारणतः १० ऑक्टोबरपर्यंत जैसे थे राहणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून विहिरी, गाव तलाव, मध्यम, लघू प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.


त्यामुळे आता जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत शेतीसाठी पहिले आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर उन्हाळा संपेपर्यंत आणखी दोन आवर्तने शक्य आहेत. धरणातील पाणीसाठा उणे १५ ते २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात उजनी ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे.

Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत