Solapur News : उजनी धरणाचे १६ दरवाजे बंद; कॅनॉलचे पाणी १० ऑक्टोबरपर्यंत राहणार सुरु!

सोलापूर : उजनी धरण सध्या १०४ टक्के (११९.३० टीएमसी) भरले असून पूर नियंत्रणासाठी धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. मागील ३७ दिवसांत धरणातून तब्बल ९३ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले. पण, काही दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने भीमा नदीत सोडले जाणारे पाणी आज बंद करण्यात आले आहे. धरणाचे १६ दरवाजे बंद करण्यात आले आहेत.


सध्या उजनीतून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी १७५ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ८० क्युसेक, बोगद्यातून २०० क्युसेक, कालव्यातून (कॅनॉल) १६०० तर विद्युत प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. नदीतून पाणी सोडणे आता पूर्णपणे बंद झाले आहे. सध्या धरणातून सोडले जाणारे पाणी साधारणतः १० ऑक्टोबरपर्यंत जैसे थे राहणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून विहिरी, गाव तलाव, मध्यम, लघू प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.


त्यामुळे आता जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत शेतीसाठी पहिले आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर उन्हाळा संपेपर्यंत आणखी दोन आवर्तने शक्य आहेत. धरणातील पाणीसाठा उणे १५ ते २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात उजनी ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे.

Comments
Add Comment

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या

Pravin Darekar : अभियांत्रिकीच्या 'डिस्टन्स' पदव्या अवैध; तरीही महापालिकेत पदोन्नत्या कशा? आमदार दरेकरांचा सवाल

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे देण्यात

NCMC Smart Card : एसटीच्या 'NCMC स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; आठवड्याभरातच १ लाखाचा टप्पा पार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला