Mukhyamantri Yojnadoot : मुख्यमंत्री योजनादूत'चा लाभ घेण्यासाठी 'या' तारखेआधीच करा अर्ज!

  230

जाणून घ्या वेतन, पात्रता आणि अर्ज पद्धत


मुंबई : राज्य सरकारने राज्यभरातील सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. त्यानंतर लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojnadoot) उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत नोकरीची (Job) संधी उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा करण्यात आली होती.


त्यानुसार महाराष्ट्रात तब्बल ५०,००० योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. याबबातची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र या उपक्रमाच्या अर्जासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ असून तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.



कसा करावा अर्ज?


योजनादूत या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराला www.mahayojanadoot.org या वेबसाइटवर नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराला वेबसाइटवर अर्ज केल्यानंतर ऑनलाइन अर्ज केलेली पत्र, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण कागदपत्रे, प्रमाणपत्रे, बँक खात्याचा पुरावा नियुक्तीच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे.



पात्रता आणि वेतन


योजनादूतसाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र असायला हवे. तसेच त्याला संगणकाचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे. योजनादूतांना १०,००० रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या