मुंबई : राज्य सरकारने राज्यभरातील सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली. त्यानंतर लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojnadoot) उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत नोकरीची (Job) संधी उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा करण्यात आली होती.
त्यानुसार महाराष्ट्रात तब्बल ५०,००० योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. याबबातची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र या उपक्रमाच्या अर्जासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ असून तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
योजनादूत या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराला www.mahayojanadoot.org या वेबसाइटवर नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराला वेबसाइटवर अर्ज केल्यानंतर ऑनलाइन अर्ज केलेली पत्र, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण कागदपत्रे, प्रमाणपत्रे, बँक खात्याचा पुरावा नियुक्तीच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे.
योजनादूतसाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र असायला हवे. तसेच त्याला संगणकाचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे. योजनादूतांना १०,००० रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…