Eknath Shinde : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना १५०० ची काय किंमत!

आळंदीमधून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर फटकेबाजी


आळंदी : वारकरी संप्रदायातील मानबिंदू शांतीब्रह्म ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या ९३ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज आळंदीच्या (Alandi) दौऱ्यावर आहेत. आळंदीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य मंदिरात जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच बळीराजाला सुखी आणि समाधानाचे दिवस येऊ देत असे साकडे देखील घातले. त्यानंतर महाराज कुरेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शांतीब्रम्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळा-वेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येण्याचे भाग्य लाभते, याहून दुसरे पुण्य काही नाही. आज गुरू-शिष्यांचा वाढदिवस आहे, यापेक्षा मोठं काय असू शकत. खरं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकार असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं स्थान नक्कीच मोठं आहे, असे म्हणत भाषणाची सुरुवात केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा देखील साधला.



सरकारने आजपर्यंत ६०० निर्णय घेतले, पण...


गेल्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. या सरकारने आजपर्यंत ६०० निर्णय घेतले. परंतु अनेक निर्णय हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले आहेत. महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. एखादी योजना लगेच सुरू करता येत नाही त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. 'मी सामान्य घरातला मुलगा आहे. आईची काटकसर बघितलेला मुलगा आहे. काही लोक १ हजार ५०० रुपयांत विकत घेता का? लाच घेता का? असे म्हणतात. विरोधकांकडून केवळ सरकारच्या योजना खोट्या असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना या रुपयांची काय किंमत', असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर धारदार टिकास्त्र सोडले आहे.


त्याचबरोबर सरकारने महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलतीचे तिकीट दिले. हा निर्णय घेताना एसटी तोट्यात येईल, असे विरोधक बोलत होते. पण आज या निर्णयामुळे एसटी फायद्यात आली आहे. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही, कधीही फसवणार नाही. माझ्याकडे येणारा एकही व्यक्ती खाली हाती जाणार नाही, एवढी मोठी शक्ती मला द्यावी, असे मागणे मी परमेश्वराकडे करतो, असेही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य