चिंताजनक! राज्यात वाढतायत चिकनगुनियाचे रुग्ण; डासांची शक्ती चारपट वाढली

नागपूर : राज्यात चिकनगुनिया (Chikungunya) आणि डेंग्यूसारख्या (Dengue) डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे रुग्ण चिंताजनक पातळीवर वाढत आहेत. हवामान बदलामुळे डासांची शक्ती आणि प्रजननक्षमता चारपट वाढली आहे, असे चेन्नईच्या आरोग्य सल्लागार डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितले.


नागपूरमध्ये आयोजित कार्यशाळेत डॉ. श्रीधर यांनी स्पष्ट केले की हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, आणि अधिक पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे डासांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राज्यात सध्या डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ सुरू असून डासांमुळे हे आजार अधिक वेगाने पसरत आहेत.


हवामान बदलामुळे डासांची भौगोलिक व्याप्ती वाढली आहे, ज्यामुळे भारतासह जगभरात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रसार वाढला आहे. उदाहरणार्थ, एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे होणारा डेंग्यू २८.६ टक्के, तर एई अल्बोपिक्टस डासामुळे होणारा डेंग्यू २७.७ टक्क्यांनी वाढला आहे. जगभरात दरवर्षी डासांमुळे ७० कोटी लोकांना आजार होतात आणि दहा लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो.


डॉ. श्रीधर यांनी हेही सांगितले की जागतिक तापमानवाढीमुळे हृदय, किडनी, आणि यकृताचे आजार झपाट्याने वाढत आहेत, तसेच महिला व पुरुषांमध्ये व्यंध्यत्वाचा धोका वाढला आहे. या बदलांमुळे दरवर्षी ६.६७ दशलक्ष मृत्यू होतात.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व