बाप्पा आला रे...

  83

हलकं-फुलकं - राजश्री वटे


किती जिव्हाळ्याचा आतून आलेला आवाज...
कारण.... तो येणार असतो ना... गोंडस, गोजिरवाणा, लोभस, लडीवाळ, बाळसेदार, गुटगुटीत...
बाप्पा मोरया रे... तो येण्याच्या किती तरी दिवस आधी ही ओळ ओठांवर गुणगुणते!!
किती तरी दिवस त्याच्या आगमनाची तयारी घराघरांत, मंडळा-मंडळात उत्साहाने सुरू होते... हे करू का... ते करू, असं करू कां तसं करू.... नुसतं उधाण आलं असतं... मनाला व कामाला!!
मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराचे हात सुद्धा माती कुरवाळत तुझं सुंदर रूप साकारतात!!
नवीन नवीन आरास डोक्यात धुमाकूळ घालत असते... काय छान दिसेल... कसं छान दिसेल!!
प्रसादाचे मोदक नैवेद्याच्या आधीच जिभेवर उड्या मारायला लागतात व या आठवणीने पोटात कावळ्यांचा दंगा चालू होतो... कधी एकदाच...😋😋

घरदार घासून पुसून स्वच्छ होऊन तोरणासाठी सज्ज, अंगण सारवून बसतं रांगोळीची वाट पहात
कधी ती येते सजून रंगून!!
चौरंग सुद्धा चकचकीत होतो त्या गुटगुटीत बाळाला मांडीत बसवायला!
किती किती तयारी त्या लडीवाळाची, त्याच्या मुक्कामात कशाची कमी पडायला नको याची पूर्ण काळजी घेतली जाते, आईला सोडून दहा दिवस ते आपल्या कडे राहणार असतं ना... बुद्धीची देवता ती... प्रत्येकाची झोळी त्याच्यापुढे पसरलेली!

पावसाने न्हाऊन माखून झालेली फुले त्याच्या गळ्यात विराजमान व्हायला तयार, तर दुर्वा पण फुलांचा हात धरून हजर!
दोन समया चौरंगाच्या दोन बाजूला मंद वाती तेवत झोकात उभ्या!
झालं... झालं... सगळं झालं... आता फक्त आगमन.....
ढोल, ताशे, टाळ... आसमंत दुमदुमुन गेला... मनातला व जगातला!!
आला रे... जल्लोष... बाप्पा मोरया रे...
डोळे दीपले त्याला पाहून.... वर्षातून एकदाच येतोस रे... पण जीव सुखावून जातो... किती करू न किती नको असं होऊन जातं रे तुझ्यासाठी!

कसं आहे न्... देवाचं अन् आपलं नातं... खूप जवळचं... आई इतकंच... म्हणून देवाशी संवाद करताना नेहमी एकेरीच संबोधतो आपण... इतकं एकरूप! त्यालाही ते आवडत असतं असं जीवाभावाचं नातं जुळणं भक्ताशी...!
तो आला... तो बसला..... मोदकाचा आस्वादही घेतला...
मन आनंंदाने नाचू लागलं...
बाप्पा मोरया रे!!! नमो नमो गणराया
तू सदा सिद्धीचा पाया
मंगलमूर्ती अगाध कीर्ती
बाप्पा मोरया रे... बाप्पा मोरया रे...
गणपती बाप्पा मोरया...
Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले