Kamala Mills Fire : अग्नितांडव! मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग

परिसरात धुराचे लोट; आगीचे कारण अस्पष्ट


मुंबई : काही दिवसांपूर्वी बोरिवली येथील २२ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत ४ नागरिक जखमी झाले होते. तर त्यातील एका वृद्ध नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुंबईतील (Mumbai News) आगीची ही घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील लोअर परेल परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग (Mumbai Kamala Mills Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान लोअर परेल येथील कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरवरील एका मजल्याला अचानक आग लागली. काही क्षणातच मोठा भडका उडाल्यामुळे या आगीने रौद्र रुप धारण केले. संपूर्णरित्या ही काचेची बिल्डिंग असल्यामुळे आगीचा धूर आतमध्ये सर्व मजल्यांपर्यंत गेला. त्यानंतर धूर बाहेर जाण्यासाठी बिल्डिंगच्या काचा देखील फोडण्यात आल्या.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आणखी तीन गाड्या मागवण्यात आल्या. शर्थिच्या प्रयत्नानंतर टाईम्स टॉवरला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक