Kamala Mills Fire : अग्नितांडव! मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग

  144

परिसरात धुराचे लोट; आगीचे कारण अस्पष्ट


मुंबई : काही दिवसांपूर्वी बोरिवली येथील २२ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत ४ नागरिक जखमी झाले होते. तर त्यातील एका वृद्ध नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुंबईतील (Mumbai News) आगीची ही घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील लोअर परेल परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग (Mumbai Kamala Mills Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान लोअर परेल येथील कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरवरील एका मजल्याला अचानक आग लागली. काही क्षणातच मोठा भडका उडाल्यामुळे या आगीने रौद्र रुप धारण केले. संपूर्णरित्या ही काचेची बिल्डिंग असल्यामुळे आगीचा धूर आतमध्ये सर्व मजल्यांपर्यंत गेला. त्यानंतर धूर बाहेर जाण्यासाठी बिल्डिंगच्या काचा देखील फोडण्यात आल्या.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आणखी तीन गाड्या मागवण्यात आल्या. शर्थिच्या प्रयत्नानंतर टाईम्स टॉवरला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता